Mumbai News : वृत्तपत्र विक्रेत्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

  54

मुंबई  : बदलापूर येथील वर्तमानपत्र विक्रेत्यांवर प्रशासनाकडून कारवाईचे उदाहरण ताजे असतानाच दादर येथील महिला असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टालवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दादर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. दुर्दैवी बाब म्हणजे ही महिला वृत्तपत्र वितरण करण्यासाठी गेली असता तिच्या अपरोक्ष ही कारवाई झाली आहे.


श्रीमती सविता कुंभार असे या महिलेचे नाव असून गेली सुमारे ४० वर्षांपासून ह्या व्यवसायात आहेत. त्यानंतर लगेच महानगपालिकेचे आयुक्तांचे स्थळ भेटीचे कारण सांगून सायन येथील वर्तमानपत्र विक्रेते सुनील लेणार यांच्याही वर्तमानपत्राच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली. दुर्दैवाची बाब म्हणजे वर्तमानपत्र विक्रेत्यांना फेरीवाला सुचीतून वगळण्यात आले आहे; परंतु फेरीवाल्यांसोबत सरसकट या वर्तमानपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवर कारवाई केली जाते. विशेष म्हणजे सगळेच विक्रेते जुने असून जास्तीत जास्त स्थानिक आहेत.



सदर कारवाईमुळे वृत्तपत्र विक्रेत्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संपूर्ण वृतपत्र विक्रेत्यांमध्ये भीतिदायक वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईमधून विक्रेत्यांना वगळण्यासाठी दिलेल्या आदेशाला हरताळ फासला आहे. याशिवाय महापालिका आयुक्तांनीही वृतपत्र विक्रेत्यांना कारवाईतून वागळण्यासाठी अनेक वेळा परिपत्रके काढली असून स्थानिक प्रशासनाने या परिपत्रकानाही जुमानले नाही.


विक्रेता समाजातील गरीब, कष्टकरी असून कोरोनानंतर मुले मिळत नसल्यामुळे त्यांना अगोदरच मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास वाढला आहे. वसुलीचा त्रास आहे सूट्टी नाहीच असे असतानाही कष्टाळू वर्तमानपत्र विक्रेत्यांवरच कारवाई करुन काय साध्य करावयाचे आहे? असा प्रश्न संघर्ष
उपस्थित केला आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.