मुंबई : बदलापूर येथील वर्तमानपत्र विक्रेत्यांवर प्रशासनाकडून कारवाईचे उदाहरण ताजे असतानाच दादर येथील महिला असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टालवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दादर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. दुर्दैवी बाब म्हणजे ही महिला वृत्तपत्र वितरण करण्यासाठी गेली असता तिच्या अपरोक्ष ही कारवाई झाली आहे.
श्रीमती सविता कुंभार असे या महिलेचे नाव असून गेली सुमारे ४० वर्षांपासून ह्या व्यवसायात आहेत. त्यानंतर लगेच महानगपालिकेचे आयुक्तांचे स्थळ भेटीचे कारण सांगून सायन येथील वर्तमानपत्र विक्रेते सुनील लेणार यांच्याही वर्तमानपत्राच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली. दुर्दैवाची बाब म्हणजे वर्तमानपत्र विक्रेत्यांना फेरीवाला सुचीतून वगळण्यात आले आहे; परंतु फेरीवाल्यांसोबत सरसकट या वर्तमानपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवर कारवाई केली जाते. विशेष म्हणजे सगळेच विक्रेते जुने असून जास्तीत जास्त स्थानिक आहेत.
सदर कारवाईमुळे वृत्तपत्र विक्रेत्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संपूर्ण वृतपत्र विक्रेत्यांमध्ये भीतिदायक वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईमधून विक्रेत्यांना वगळण्यासाठी दिलेल्या आदेशाला हरताळ फासला आहे. याशिवाय महापालिका आयुक्तांनीही वृतपत्र विक्रेत्यांना कारवाईतून वागळण्यासाठी अनेक वेळा परिपत्रके काढली असून स्थानिक प्रशासनाने या परिपत्रकानाही जुमानले नाही.
विक्रेता समाजातील गरीब, कष्टकरी असून कोरोनानंतर मुले मिळत नसल्यामुळे त्यांना अगोदरच मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास वाढला आहे. वसुलीचा त्रास आहे सूट्टी नाहीच असे असतानाही कष्टाळू वर्तमानपत्र विक्रेत्यांवरच कारवाई करुन काय साध्य करावयाचे आहे? असा प्रश्न संघर्ष
उपस्थित केला आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…