सावधान ! जनगणनेच्या नावाखाली सुरू आहे फसवणूक

मुंबई : मुंबईत जनगणनेच्या नावाखाली फसवणूक सुरू असल्याचे उघड झाले आहे. दुपारच्या वेळी घरातील तरुण वर्ग जेव्हा शिक्षण किंवा नोकरी - व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर असतो त्याचवेळी काही बोगस सरकारी अधिकारी निवासी वस्त्यांमध्ये प्रवेश करत आहेत. बनावट सरकारी कागदपत्र दाखवून जनगणना सुरू आहे, असे सांगून माहिती घेण्यासाठी घरात प्रवेश मिळवतात. पिण्यासाठी पाणी मागतात. घरातील सदस्य बेसावध आहेत याचा अंदाज येताच शस्त्राचा धाक दाखवून लुटालूट करतात. काही ठिकाणी हाच प्रकार आरक्षणासाठी सॅम्पल सर्व्हे सुरू आहे अथवा आयुष्मान भारत वा अन्य एखाद्या सरकारी योजनेसाठी माहिती हवी आहे असे सांगून केला जात आहे. राज्यात जनगणना अथवा कोणत्याही सरकारी सॅम्पल सर्व्हेचे काम सध्या सुरू नाही. यामुळे कोणीही जनगणना अथवा सॅम्पल सर्व्हेसाठी माहिती मागत असल्यास जास्त बोलणे टाळा आणि दार बंद करुन घ्या; हा सुरक्षित राहण्याचा एक सोपा पण प्रभावी पर्याय आहे.

सरकारच्या कल्याणकारी योजनेसाठी फोटो, बोटांचे ठसे अशा स्वरुपात माहिती हवी असल्याचे कारण सांगून बनावट सरकारी अधिकारी घरात प्रवेश करतात. आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, फोटो, बोटांचे ठसे ही माहिती घेऊन नंतर त्याचा सायबर घोटाळ्यांसाठी गैरवापर करतात असेही उघड झाले आहे. केंद्र किंवा राज्य सरकार कोणत्याही कल्याणकारी योजनेसाठी फोटो, बोटांचे ठसे अशा स्वरुपाची खासगी माहिती घरोघरी जाऊन घेत नाही. अधिकृत सरकारी केंद्रावर नागरिकांना येण्याचे आवाहन केले जाते. या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा तसेच आवश्यक ते खबरदारीचे उपाय करुन माहितीचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेतली जाते. यामुळे नागरिकांनी बनावट सरकारी ओळखपत्र आणि इतर कागदपत्र दाखवून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध रहावे; असे आवाहन स्थानिक पोलिसांनी केले आहे.
Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व