धोबी घाटावरील धुरांड्या होणार बंद

आता होणार भट्टयांमध्ये पीएनजीचा वापर


मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील येणाऱ्या महालक्ष्मी येथील धोबीघाट परिसरात मोठ्या प्रमाणात लाकूड आणि चिंध्यांचा वापर आगभट्टींमध्ये करण्यात येतो. त्यामुळे वायू प्रदुषणात वाढ होत असल्याने महापालिकेने लाकडांचा वापर करण्यात येणाऱ्या बेकऱ्यांना भटटया पीएनजीचा वापर करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यानुसार महालक्ष्मी येथील धोबीघाटांमध्येही जळावू लाकडाचा वापर केला जात असल्याने त्याठिकाणी पीएनजीसाठी पाऊल उचलले आहे. त्या दृष्टिकोनातून त्याठिकाणी पीएनजीची उभारणी केली जात आहे. मुंबई महापालिकेतंर्गत असलेल्या महालक्ष्मी धोबी घाटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. या धोबीघाटाचा विस्तार सुमारे ८१.४९ चौ.मी असून सन २०११ मध्ये जगातील सर्वांत मोठा धोबधाट म्हणून याची गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डद्वारे नोंद झाली आहे.


धोबीघाटावर काम करणारा धोबी समाज हा धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास सहकारी संस्था मर्यादितशी संलग्न आहे. धोबी घाटातील कामगारांना दैनंदिन कामकाजा दरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही संस्था स्थापन केली गेली. गेल्या अनेक वर्षांपासून धोबी बांधव कपडे धूणे, रंगरंगोटी करण्यासंबंधीचे कामकाज करत आहेत. या ठिकाणी कपडे वाळविणे आणि कपडयांना इस्त्री करणे, या प्रक्रियेमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा वापर, भट्टी जाळण्यासाठी आणि पाणी उकळण्यासाठी इंधन म्हणून लाकडी सामुग्रीसह रसायने असलेल्या चिंध्या, टाकाऊ कापड आणि टाकाऊ प्लास्टिकचा वापर यांचा समावेश होतो.



या पद्धतीमुळे येथे काम करणाऱ्या लोकांमध्ये दमा, क्षयरोग तसेच कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचे प्रमाणे वाढले आहे. शिवाय अशा ज्वलनामुळे मुंबईच्या पर्यावरणातील प्रदुषके वाढवण्यात मोठा हातभार लागतो. दररोज मोठ्या प्रमाणात एलपीजी सिलिंडर वापरले जात असल्याने सध्याच्या जागेच्या मर्यादांमुळे स्टोरेज मर्यादांचा सामना करावा लागतो. तसेच एलपीजी सिलिंडरचा वापर त्यास एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन अपघात होण्याची शक्यता अधिक असते. पी.एन.जी. पर्यावरणपूरक असल्याने एलपीजीपेक्षा सुरक्षित व किफायतशीरही आहे. एलपीजीच्या धोक्यांमुळे धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास सहकारी संस्था मर्या., आणि धोबीघाट समाजाने धोबीघाटातील थेट ग्राहकांसाठी स्वतंत्र पाईप गॅस जोडणीची मागणी केली आहे.



महालक्ष्मी धोबीघाट ही मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या ठिकाणच्या ऐतिहासिक वारसाचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक असल्याने धोबीघाटवर पी.एन.जी. वितरण व जोडणी तसेच सुयोग्य उपकरणे आदींची उभारणी केली जात असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या कामांसाठी महापालिकेच्या वतीने सुमारे २४ कोटी रुपये खर्च केले जाणार असून यासाठी ओशिपॅनिक इंजिनिअर्स अँड कन्सल्टंस या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला