धोबी घाटावरील धुरांड्या होणार बंद

आता होणार भट्टयांमध्ये पीएनजीचा वापर


मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील येणाऱ्या महालक्ष्मी येथील धोबीघाट परिसरात मोठ्या प्रमाणात लाकूड आणि चिंध्यांचा वापर आगभट्टींमध्ये करण्यात येतो. त्यामुळे वायू प्रदुषणात वाढ होत असल्याने महापालिकेने लाकडांचा वापर करण्यात येणाऱ्या बेकऱ्यांना भटटया पीएनजीचा वापर करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यानुसार महालक्ष्मी येथील धोबीघाटांमध्येही जळावू लाकडाचा वापर केला जात असल्याने त्याठिकाणी पीएनजीसाठी पाऊल उचलले आहे. त्या दृष्टिकोनातून त्याठिकाणी पीएनजीची उभारणी केली जात आहे. मुंबई महापालिकेतंर्गत असलेल्या महालक्ष्मी धोबी घाटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. या धोबीघाटाचा विस्तार सुमारे ८१.४९ चौ.मी असून सन २०११ मध्ये जगातील सर्वांत मोठा धोबधाट म्हणून याची गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डद्वारे नोंद झाली आहे.


धोबीघाटावर काम करणारा धोबी समाज हा धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास सहकारी संस्था मर्यादितशी संलग्न आहे. धोबी घाटातील कामगारांना दैनंदिन कामकाजा दरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही संस्था स्थापन केली गेली. गेल्या अनेक वर्षांपासून धोबी बांधव कपडे धूणे, रंगरंगोटी करण्यासंबंधीचे कामकाज करत आहेत. या ठिकाणी कपडे वाळविणे आणि कपडयांना इस्त्री करणे, या प्रक्रियेमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा वापर, भट्टी जाळण्यासाठी आणि पाणी उकळण्यासाठी इंधन म्हणून लाकडी सामुग्रीसह रसायने असलेल्या चिंध्या, टाकाऊ कापड आणि टाकाऊ प्लास्टिकचा वापर यांचा समावेश होतो.



या पद्धतीमुळे येथे काम करणाऱ्या लोकांमध्ये दमा, क्षयरोग तसेच कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचे प्रमाणे वाढले आहे. शिवाय अशा ज्वलनामुळे मुंबईच्या पर्यावरणातील प्रदुषके वाढवण्यात मोठा हातभार लागतो. दररोज मोठ्या प्रमाणात एलपीजी सिलिंडर वापरले जात असल्याने सध्याच्या जागेच्या मर्यादांमुळे स्टोरेज मर्यादांचा सामना करावा लागतो. तसेच एलपीजी सिलिंडरचा वापर त्यास एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन अपघात होण्याची शक्यता अधिक असते. पी.एन.जी. पर्यावरणपूरक असल्याने एलपीजीपेक्षा सुरक्षित व किफायतशीरही आहे. एलपीजीच्या धोक्यांमुळे धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास सहकारी संस्था मर्या., आणि धोबीघाट समाजाने धोबीघाटातील थेट ग्राहकांसाठी स्वतंत्र पाईप गॅस जोडणीची मागणी केली आहे.



महालक्ष्मी धोबीघाट ही मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या ठिकाणच्या ऐतिहासिक वारसाचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक असल्याने धोबीघाटवर पी.एन.जी. वितरण व जोडणी तसेच सुयोग्य उपकरणे आदींची उभारणी केली जात असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या कामांसाठी महापालिकेच्या वतीने सुमारे २४ कोटी रुपये खर्च केले जाणार असून यासाठी ओशिपॅनिक इंजिनिअर्स अँड कन्सल्टंस या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

Bmc News, Andheri Subway : अंधेरी सब वे मधील पावसाचे तुंबणारे पाणी,  महापौरांनी  रेल्वेशी समन्वय राखून गती देण्याचे महापालिकेला दिले निर्देश

मुंबई : अंधेरी भूयारी मार्ग हा अतिसखल परिसर असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला? पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला