Ranveer Allahbadia row: सायबर सेलने बजावले समय रैना, तन्मय भट, राखी सावंत, उर्फी जावेद, सिद्धांत चतुर्वेदी आणि दीपक कलाल यांच्यासह ४० जणांना समन्स

मुंबई पोलिसांनी नोंदवले सात जणांचे जबाब


मुंबई : 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या एका भागात युट्यूबर रणवीर अलाहबादिया (Ranveer Allahbadia) याने केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या चौकशीच्या संदर्भात (Ranveer Allahbadia case) महाराष्ट्र सायबर सेलने कंटेंट क्रिएटर्स, इन्फ्लुएंसर आणि शोचे सूत्रसंचालक समय रैना (Samay Raina) याच्यासह ४० हून अधिक जणांना समन्स बजावले आहे. तर मुंबई पोलिसांनी आतापर्यंत सोशल मीडिया इंन्फ्लुएंसर अपूर्वा मुखिजासह सात जणांचे जबाब नोंदवले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, अलाहबादिया लवकरच चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता आहे. तसेच, आसाम पोलिसांचे एक पथकही या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईत दाखल झाले आहे. गुवाहाटी पोलिसांनी अलाहबादिया आणि इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, महाराष्ट्र सायबर विभागाने या प्रकरणी यूट्यूब शोच्या सहभागींना चौकशीत सहकार्य करण्यास सांगितले आहे.


सायबर पोलिसांनी यूट्यूब शोच्या मागील भागांमध्ये सहभागी झालेल्या पाहुणे आणि न्यायाधीश यांना देखील नोटीस बजावली आहे. आतापर्यंत, अलाहबादियाच्या व्यवस्थापकासह सात जणांनी जबाब नोंदवले आहेत. उर्वरित व्यक्ती लवकरच चौकशीसाठी हजर होतील, अशी शक्यता आहे.



सोशल मीडियावर १.६ कोटींहून अधिक फॉलोअर्स असलेल्या अलाहबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यावर मोठा वाद निर्माण झाला असून, त्याने यावर माफी मागितली आहे.


शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत या मुद्द्यावर सोशल मीडियाचे नियमन करण्याच्या गरजेवर भर दिला आहे. तर राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) अलाहबादिया, समय रैना, अपूर्वा मुखिजा, जसप्रीत सिंग, आशिष चंचलानी आणि शोचे निर्माते तुषार पुजारी व सौरभ बोथरा यांना १७ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.


महाराष्ट्र सायबर सेलने यूट्यूब शोशी संबंधित तपासाच्या अनुषंगाने तन्मय भट, राखी सावंत, उर्फी जावेद, सिद्धांत चतुर्वेदी आणि दीपक कलाल यांनाही समन्स बजावले आहे. सायबर सेलने अलाहबादियासह ३० जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला असून, त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


बुधवारी, शोची जज अपूर्वा मुखिजा खार पोलिसांसमोर हजर झाली. जिथे तिचा जबाब तिच्या वकिलांच्या उपस्थितीत नोंदवण्यात आला. खार पोलिसांनी आतापर्यंत सात जणांचे जबाब नोंदवले असले तरी अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही.


दरम्यान, स्टँडअप कॉमेडियन समय रैना याने सोशल मीडियावरून "इंडियाज गॉट लेटेंट" चे सर्व संबंधित व्हिडिओ काढून टाकले आहेत. त्याने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे सांगितले की, "या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून मी सर्व एजन्सींना सहकार्य करणार आहे."


दरम्यान, सायबर सेलने मंगळवारी यूट्यूब शोशी संबंधित अलाहबादियासह ३० जणांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला होता. सांताक्रूझमधील रहिवासी आणि शोचे सदस्य असलेल्या ३८ वर्षीय व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरून, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील सामग्री प्रसारित करणे) आणि भारतीय न्याय संहिताच्या कलम ७९ (महिलेच्या विनम्रतेचा अपमान करणे), १९६ (वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे), २९६ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये आणि गाणी), २९९ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये आणि गाणी) अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बुधवारी, 'द रिबेल किड' म्हणून लोकप्रिय असलेला आणि या शोच्या जज असलेल्या अपूर्वा मखीजा खार पोलिसांसमोर हजर झाली. तिची स्वतंत्र चौकशी सुरु आहे.


"आम्ही मखीजाचा जबाब तिच्या वकिलाच्या उपस्थितीत नोंदवला," असे खार पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. खार पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित सात जणांचे जबाब नोंदवले आहेत, परंतु अद्याप एफआयआर नोंदवलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.


दरम्यान, बुधवारी, शोशी संबंधित स्टँडअप कॉमेडियन समय रैना याने त्याच्या यूट्यूब चॅनलवरून सर्व संबंधित व्हिडिओ काढून टाकले.


अलाहबादिया याच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्याने त्याच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "जे काही घडत आहे ते माझ्यासाठी खूप जास्त आहे. मी माझ्या चॅनलवरून इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहेत. माझा एकमेव उद्देश लोकांना हसवणे आणि मजा करणे हा होता. त्यांच्या चौकशी निष्पक्षपणे पूर्ण करण्यासाठी मी सर्व एजन्सींना पूर्ण सहकार्य करेन."

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत