राज्यात आजपासून मिशन बारावी; केंद्रावर अकरानंतर ‘नो एंट्री’

१५ लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा


मुंबई : बारावीची परीक्षा सुरू होत असून ११ फेब्रुवारी ते २८ मार्च कालावधीत बारावीची परीक्षा होत आहे. यंदाच्या वर्षी परीक्षेत १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये ८ लाख १० हजार ३४८ मुले, तर ६ लाख ९४ हजार ६५२ मुली आहेत. यंदा ३७ तृतीयपंथी नागरिकही परीक्षेसाठी बसले आहेत. राज्यात १० हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयांतील या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ३ हजार ३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.


विज्ञान शाखेला ६८ हजार ९६७ विद्यार्थी, कला शाखेला तीन लाख ८० हजार ४१० विद्यार्थी, वाणिज्य शाखेला तीन लाख १९ हजार ४३९ विद्यार्थी, तर किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम ३१ हजार ७३५ विद्यार्थी आहेत. टेक्निकल सायन्स ४ हजार ४८६ असे १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी यंदा परीक्षा देणार आहेत. पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा होणार आहे. नऊ विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेमध्ये वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेला आहे. दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील, त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.



शिक्षणमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा!


शासन, प्रशासन, पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणताही तणाव न घेता, सर्वतोपरी प्रयत्न करून उत्तम कामगिरी करा, अशा शब्दांत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


दडपण न घेता परीक्षेला सामोरे जा


‘मी यशस्वी होणार आहे’, असा विचार मनात बाळगून परीक्षेला सामोरे जावे. आत्मविश्वास बाळगला तरच आपल्याला परीक्षेत यश मिळणार आहे. अभ्यास कमी झाला असेल तरी प्रत्येक पेपरमध्ये अंतर आहे. त्याचा पुरेपर वापर करा. दडपण न घेता परीक्षेला सामोरे जा, असा सल्ला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे समुपदेशक अशोक सरोदे यांनी दिला आहे.


राज्यात २७१ भरारी पथके


परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय दक्षता समिती कार्यरत असून विभागीय मंडळात विशेष भरारी पदके स्थापन करण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

Heat wave in Maharashtra : राज्यात पुढील दोन दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता

मुंबई : राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून अनेक भागांत तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे.

Pune Traffic Update: पुणेकरांनो पोलीस भरतीमुळे 'या' भागातील वाहतुकीत मोठे बदल; घराबाहेर जाण्याआधी...

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई (चालक) पदासाठीची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेतील अत्यंत

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी तरतूद

पुणे : पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा, खडकवासला-स्वारगेट-हडपसर-लोणी काळभोर मार्ग आणि पुणे ते शिरूर ५३ किमीचा उन्नत

Buldhana News: आईला कॉल करत संपवलं आयुष्य; नेमकं घडलं काय?

बुलढाणा: आईला शेवटचा कॉल करुन तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची बातमी समोर येत आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी

‘शाळा बंद’ धोरणाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान

हायकोर्टाने बजावली शिक्षण विभागास नोटीस अमरावती : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९