अखेर रोहित शर्मा चमकला, केले ४९ वे आंतरराष्ट्रीय शतक

  115

कटक : बाराबती स्टेडियममध्ये झालेला इंग्लंड विरुद्धचा एकदिवसीय सामना भारताने चार गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने इंग्लंड विरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २ - ० अशी जिंकली. कटकच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माची बॅट तळपली. त्याने ९० चेंडूत सात षटकार आणि बारा चौकार मारत ११९ धावांची खेळी केली. रोहितच्या शतकामुळे भारताचा विजयाचा मार्ग सुकर झाला. या सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार रोहित शर्माला देण्यात आला.



मागील अनेक दिवसांपासून क्रिकेटप्रेमी वाईट कामगिरीसाठी रोहित शर्मावर टीका करत होते. अखेर रोहितने टीकाकारांना बॅटद्वारे प्रत्युत्तर दिले. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये १२, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३२ आणि टी २० मध्ये ५ अशी ४९ आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याची कामगिरी केली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४३०२, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०९८७ आणि टी २० मध्ये ४२३१ अशा एकूण १९ हजार ५२० धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केल्या आहेत.



कटकच्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडने ४९.५ षटकांत सर्वबाद ३०४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ४४.३ षटकांत ६ बाद ३०८ धावा करुन सामना जिंकला. भारताने इंग्लंड विरुद्धचा नागपूरमधील एकदिवसीय सामना चार गडी राखून आणि कटकमधील सामनाही चार गडी राखून जिंकला. लागोपाठ दोन विजय मिळवणारा भारतीय संघ आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमध्ये बुधवार १२ फेब्रुवारी रोजी विजयाची हॅटट्रिक करण्यास उत्सुक असेल तर इंग्लंड व्हाईट वॉश टाळण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल.
Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी