India vs England: दुसऱ्या वनडेत भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय, मालिकेत २-० ने विजयी आघाडी

रोहितचं शतक, गिलचं अर्धशतक


कटक: तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना आज खेळला गेला. हा सामना भारताने इंग्लंडवर ४ गडी राखून जिंकला. भारताने ४४.३ षटकांत ३०८ धावा करत सहा गडी गमावले. यासह या मालिकेत भारताने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजाने ही गोलंदाजीत ३ गडी बाद करत महत्त्वाची भूमिका बजावली. यासह भारताने सलग सातव्यांदा मालिका विजय नोंदवला.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना आज, रविवारी कटकच्या बाराबाती स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर विजयासाठी ३०५ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि सामन्यासह मालिका आपल्या नावावर केली.

रोहितने पहिल्या चेंडूपासून इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला आणि ३० चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर ७६ चेंडूंमध्ये आपल्या वनडे कारकिर्दीतील शतकही पूर्ण केलं. रोहितने या डावात ९० चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि ७ षटकारांच्या साहाय्याने ११९ धावांची खेळी केली. तर त्याला शुभमन गिलची चांगली साथ मिळाली. गिलने ५२ चेंडूंचा सामना करत ९ चौकार आणि १ षटकारांच्या साहाय्याने ६० धावांची खेळी केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १३६ धावा जोडल्या.

शुभमन गिल ६० धावांवर बाद झाल्यानंतर विराट कोहलीवर मोठी जबाबदारी होती. मात्र विराट अवघ्या ५ धावा करत तंबूत परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि रोहित शर्माची जोडी जमली. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली आणि भारतीय संघाकडे विजयश्री खेचून आणण्यात मोलाची भर टाकली. श्रेयस ४४ धावांवर धाव बाद होऊन माघारी परतला. शेवटी अक्षर पटेलने भारतीय संघाचा डाव सांभाळला आणि भारताला विजय मिळवून दिला.

आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी, १२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी १.३० वाजता खेळवला जाईल.
Comments
Add Comment

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.