Sinhgad Tourist : सिंहगडावर फिरायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

खडकवासला : टवाळखोरांनी फटाके फोडल्यामुळे पर्यटकांवर संकटावर ओढवले. लोणावळ्यात एकविरा गडाच्या पायथ्याशी काही टवाळखोर मुलांनी फटाके फोडले. यामुळे प्रचंड धूर झाला. धुराचा परिसातील मधमाशांना त्रास झाला. त्रासलेल्या मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. यानंतर सिंहगडावर रविवारी ९ फेब्रुवारी रोजी मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली.



खडकवासला येथील सिंहगडाच्या कल्याण दरवाजावर संध्याकाळी पर्यटक गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास काही पर्यटक सूर्यास्त बघण्यासाठी तिथे गेले होते. निवडक पर्यटक सूर्यास्त बघत होते तर मर्यादीत पर्यटक गडावरुन खाली उतरत होते. त्याच वेळी कल्याण दरवाजाच्या तटबंदीखाली कड्यावर असलेल्या आग्या मोहोळाच्या मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला.



या हल्ल्याचं कारण अस्पष्ट असलं तरी मधमाशांचा धोका पाहून वनविभागाने पर्यटकांना गडावर जाण्यास बंदी घातली. या हल्ल्यात २० पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाले. यामध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना सुखरुप गडाखाली आणून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. वनविभागाच्या तत्परतेने हजारो पर्यटकांचे प्राण वाचले.

Comments
Add Comment

Pune School Holiday: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 19 जानेवारीला शाळांना सुट्टी, मुख्य रस्ते बंद,ग्रँड टूरमुळे शहरात...

पुणे: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयांना रजा देण्यात

कोल्हापूर ACB मधील DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा अपघात; दोन जणांचा मृत्यू, चित्रदुर्गमध्ये उपचार सुरू

चित्रदुर्ग : कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या वाहनाला

Nagpur News: नागपुरात आयकर विभागाची व्यापाऱ्यावंर मोठी कारवाई

नागपूर : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच नागपूर शहरात आयकर विभागाने मोठी धडक कारवाई करत

कोल्हापुरात प्रसुतीनंतर डिस्चार्ज घेऊन घरी जाताना अपघात, बाळंतीणचा मृत्यू, सात दिवसांचं बाळ जखमी, PI ची तडकाफडकी बदली

कोल्हापूर : गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर कानडेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नेसरी पोलीस ठाण्यातील

Mumbai - Pune Expressway : अटल सेतुपासुन थेट पुण्यापर्यंत ९० मिनिटात,नक्की मार्ग काय ?

Mumbai - Pune Expressway : मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांरीकांना मोठा

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर