खडकवासला : टवाळखोरांनी फटाके फोडल्यामुळे पर्यटकांवर संकटावर ओढवले. लोणावळ्यात एकविरा गडाच्या पायथ्याशी काही टवाळखोर मुलांनी फटाके फोडले. यामुळे प्रचंड धूर झाला. धुराचा परिसातील मधमाशांना त्रास झाला. त्रासलेल्या मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. यानंतर सिंहगडावर रविवारी ९ फेब्रुवारी रोजी मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली.
खडकवासला येथील सिंहगडाच्या कल्याण दरवाजावर संध्याकाळी पर्यटक गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास काही पर्यटक सूर्यास्त बघण्यासाठी तिथे गेले होते. निवडक पर्यटक सूर्यास्त बघत होते तर मर्यादीत पर्यटक गडावरुन खाली उतरत होते. त्याच वेळी कल्याण दरवाजाच्या तटबंदीखाली कड्यावर असलेल्या आग्या मोहोळाच्या मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला.
या हल्ल्याचं कारण अस्पष्ट असलं तरी मधमाशांचा धोका पाहून वनविभागाने पर्यटकांना गडावर जाण्यास बंदी घातली. या हल्ल्यात २० पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाले. यामध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना सुखरुप गडाखाली आणून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. वनविभागाच्या तत्परतेने हजारो पर्यटकांचे प्राण वाचले.
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…
भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…
अॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…
राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…
प्रा. देवबा पाटील आनंदराव हे सेवानिवृत्त वैज्ञानिक असल्याने त्यांना विज्ञानाच्या सर्वच गोष्टी माहीत होत्या. ते…