Sinhgad Tourist : सिंहगडावर फिरायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

खडकवासला : टवाळखोरांनी फटाके फोडल्यामुळे पर्यटकांवर संकटावर ओढवले. लोणावळ्यात एकविरा गडाच्या पायथ्याशी काही टवाळखोर मुलांनी फटाके फोडले. यामुळे प्रचंड धूर झाला. धुराचा परिसातील मधमाशांना त्रास झाला. त्रासलेल्या मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. यानंतर सिंहगडावर रविवारी ९ फेब्रुवारी रोजी मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली.



खडकवासला येथील सिंहगडाच्या कल्याण दरवाजावर संध्याकाळी पर्यटक गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास काही पर्यटक सूर्यास्त बघण्यासाठी तिथे गेले होते. निवडक पर्यटक सूर्यास्त बघत होते तर मर्यादीत पर्यटक गडावरुन खाली उतरत होते. त्याच वेळी कल्याण दरवाजाच्या तटबंदीखाली कड्यावर असलेल्या आग्या मोहोळाच्या मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला.



या हल्ल्याचं कारण अस्पष्ट असलं तरी मधमाशांचा धोका पाहून वनविभागाने पर्यटकांना गडावर जाण्यास बंदी घातली. या हल्ल्यात २० पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाले. यामध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना सुखरुप गडाखाली आणून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. वनविभागाच्या तत्परतेने हजारो पर्यटकांचे प्राण वाचले.

Comments
Add Comment

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी