रायपूर : छत्तीसडमध्ये एका चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा पथकांनी छत्तीसडमध्ये ४० दिवसांत ८० नक्षलवादी ठार केले. सुरक्षा पथकांच्या या धडक कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या कारवाया थंडावल्या आहेत.
रविवारी डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (डीआरजी), स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि बस्तर फायटर या तीन दलांनी संयुक्त कारवाई करुन एका चकमकीत ३१ नक्षलवाद्यांना ठार केले. ही २०२५ मधील आतापर्यंतची सुरक्षा पथकांची नक्षलवाद्यांच्या विरोधातील सर्वात मोठी कारवाई आहे.
छत्तीसगडमध्ये बस्तर हा नक्षलवाद्यांचा मुख्य तळ समजला जातो. सुरक्षा पथके हा नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. मागील काही दिवसांत मिळालेल्या यशामुळे सुरक्षा पथकांचा आत्मविश्वास वाढला आहे.
छत्तीसगडमध्ये भाजपा सत्तेत आल्यापासून आतापर्यंत २६८ नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच ७५० नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. सुरक्षा पथकांनी छत्तीसगडमध्ये एक हजारांपेक्षा जास्त नक्षलवाद्यांना अटक केली आहे. छत्तीसगडमध्ये सुरक्षा पथकांनी २०२५ हे वर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास ३०० नक्षलवाद्यांना ठार केले आहे. सुरक्षा पथकांनी २१ जानेवारी २०२५ रोजी गरियाबंद जिल्ह्यात १८ नक्षलवाद्यांना ठार केले. आधी हीच सुरक्षा पथकांची २०२५ मधील सर्वात मोठी कारवाई होती. आता रविवार ९ फेब्रुवारी रोजी केलेली कारवाई ही सुरक्षा पथकांची नक्षलवद्यांच्या विरोधातील सर्वात मोठी कारवाई झाली आहे.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…