छत्तीसडमध्ये एका चकमकीत ३१ आणि ४० दिवसांत ८० नक्षलवादी ठार

रायपूर : छत्तीसडमध्ये एका चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा पथकांनी छत्तीसडमध्ये ४० दिवसांत ८० नक्षलवादी ठार केले. सुरक्षा पथकांच्या या धडक कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या कारवाया थंडावल्या आहेत.



रविवारी डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (डीआरजी), स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि बस्तर फायटर या तीन दलांनी संयुक्त कारवाई करुन एका चकमकीत ३१ नक्षलवाद्यांना ठार केले. ही २०२५ मधील आतापर्यंतची सुरक्षा पथकांची नक्षलवाद्यांच्या विरोधातील सर्वात मोठी कारवाई आहे.



छत्तीसगडमध्ये बस्तर हा नक्षलवाद्यांचा मुख्य तळ समजला जातो. सुरक्षा पथके हा नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. मागील काही दिवसांत मिळालेल्या यशामुळे सुरक्षा पथकांचा आत्मविश्वास वाढला आहे.



छत्तीसगडमध्ये भाजपा सत्तेत आल्यापासून आतापर्यंत २६८ नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच ७५० नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. सुरक्षा पथकांनी छत्तीसगडमध्ये एक हजारांपेक्षा जास्त नक्षलवाद्यांना अटक केली आहे. छत्तीसगडमध्ये सुरक्षा पथकांनी २०२५ हे वर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास ३०० नक्षलवाद्यांना ठार केले आहे. सुरक्षा पथकांनी २१ जानेवारी २०२५ रोजी गरियाबंद जिल्ह्यात १८ नक्षलवाद्यांना ठार केले. आधी हीच सुरक्षा पथकांची २०२५ मधील सर्वात मोठी कारवाई होती. आता रविवार ९ फेब्रुवारी रोजी केलेली कारवाई ही सुरक्षा पथकांची नक्षलवद्यांच्या विरोधातील सर्वात मोठी कारवाई झाली आहे.
Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन