छत्तीसडमध्ये एका चकमकीत ३१ आणि ४० दिवसांत ८० नक्षलवादी ठार

रायपूर : छत्तीसडमध्ये एका चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा पथकांनी छत्तीसडमध्ये ४० दिवसांत ८० नक्षलवादी ठार केले. सुरक्षा पथकांच्या या धडक कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या कारवाया थंडावल्या आहेत.



रविवारी डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (डीआरजी), स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि बस्तर फायटर या तीन दलांनी संयुक्त कारवाई करुन एका चकमकीत ३१ नक्षलवाद्यांना ठार केले. ही २०२५ मधील आतापर्यंतची सुरक्षा पथकांची नक्षलवाद्यांच्या विरोधातील सर्वात मोठी कारवाई आहे.



छत्तीसगडमध्ये बस्तर हा नक्षलवाद्यांचा मुख्य तळ समजला जातो. सुरक्षा पथके हा नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. मागील काही दिवसांत मिळालेल्या यशामुळे सुरक्षा पथकांचा आत्मविश्वास वाढला आहे.



छत्तीसगडमध्ये भाजपा सत्तेत आल्यापासून आतापर्यंत २६८ नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच ७५० नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. सुरक्षा पथकांनी छत्तीसगडमध्ये एक हजारांपेक्षा जास्त नक्षलवाद्यांना अटक केली आहे. छत्तीसगडमध्ये सुरक्षा पथकांनी २०२५ हे वर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास ३०० नक्षलवाद्यांना ठार केले आहे. सुरक्षा पथकांनी २१ जानेवारी २०२५ रोजी गरियाबंद जिल्ह्यात १८ नक्षलवाद्यांना ठार केले. आधी हीच सुरक्षा पथकांची २०२५ मधील सर्वात मोठी कारवाई होती. आता रविवार ९ फेब्रुवारी रोजी केलेली कारवाई ही सुरक्षा पथकांची नक्षलवद्यांच्या विरोधातील सर्वात मोठी कारवाई झाली आहे.
Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने