छत्तीसडमध्ये एका चकमकीत ३१ आणि ४० दिवसांत ८० नक्षलवादी ठार

रायपूर : छत्तीसडमध्ये एका चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा पथकांनी छत्तीसडमध्ये ४० दिवसांत ८० नक्षलवादी ठार केले. सुरक्षा पथकांच्या या धडक कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या कारवाया थंडावल्या आहेत.



रविवारी डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (डीआरजी), स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि बस्तर फायटर या तीन दलांनी संयुक्त कारवाई करुन एका चकमकीत ३१ नक्षलवाद्यांना ठार केले. ही २०२५ मधील आतापर्यंतची सुरक्षा पथकांची नक्षलवाद्यांच्या विरोधातील सर्वात मोठी कारवाई आहे.



छत्तीसगडमध्ये बस्तर हा नक्षलवाद्यांचा मुख्य तळ समजला जातो. सुरक्षा पथके हा नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. मागील काही दिवसांत मिळालेल्या यशामुळे सुरक्षा पथकांचा आत्मविश्वास वाढला आहे.



छत्तीसगडमध्ये भाजपा सत्तेत आल्यापासून आतापर्यंत २६८ नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच ७५० नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. सुरक्षा पथकांनी छत्तीसगडमध्ये एक हजारांपेक्षा जास्त नक्षलवाद्यांना अटक केली आहे. छत्तीसगडमध्ये सुरक्षा पथकांनी २०२५ हे वर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास ३०० नक्षलवाद्यांना ठार केले आहे. सुरक्षा पथकांनी २१ जानेवारी २०२५ रोजी गरियाबंद जिल्ह्यात १८ नक्षलवाद्यांना ठार केले. आधी हीच सुरक्षा पथकांची २०२५ मधील सर्वात मोठी कारवाई होती. आता रविवार ९ फेब्रुवारी रोजी केलेली कारवाई ही सुरक्षा पथकांची नक्षलवद्यांच्या विरोधातील सर्वात मोठी कारवाई झाली आहे.
Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे