Pune Crime : घरच्या त्रासाला कंटाळून महिलेने घेतला चिमुकल्यांचा जीव; पतीवरही केले वार अन्...

  55

पुणे : देशभरात अपघात, आत्महत्या, मर्डर, बलात्कार अशा क्राईम घटना सातत्याने घडत असल्याचे दिसत आहे. सांस्कृतिक राजधानी मानले जाणारे पुणे शहर क्राईम घटनांमध्ये अव्वल स्थानी आहे. अशातच याच पुणे शहरात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पुण्यातील दौंडमध्ये एका महिलेने घरात सतत होणाऱ्या वादाला कंटाळून पोटच्या लहान मुलांसह पती आणि सासऱ्यांवर कोयत्याने वार केला आहे. (Pune Crime)



आज पहाटेच्या सुमारास दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीमध्ये ही घटना घडली. पती-पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला त्रासून महिलेने थेट आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केली. तसेच महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केले. शंभू मिढे (१) आणि पियू मिढे (३) अशी मृत मुलांची नावे आहेत. तर पती दुर्योधन मिढे (३५) या घटनेत जखमी झाले आहेत.


दरम्यान, या घटनेनंतर दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलिसांनी या ३० वर्षीय आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. (Pune Crime)

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक