मुंबई: इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने दडपणाखाली असतात. या विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाइन समुपदेशन करण्यासाठी राज्य मंडळस्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बोर्डातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ व दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात करण्यात आलेल्या आहेत.
भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक लेखी परीक्षेपूर्वी, परीक्षा कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबधित प्रश्न याबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये, असे राज्य मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर यांनी स्पष्ट केले आहे.समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे
१) ९०११३०२९९७, २) ८२६३८७६८९६, ३) ८७६७७५३०६९, ४) ७३८७४००९७०, ५) ९९६०६४४४११, ६) ७२०८७७५११५ ७) ८१६९२०२२१४, ८) ९८३४०८४५९३, ९) ८३२९२३००२२, १०) ९५५२९८२११५
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…