दिल्लीचा कल, फुलले भाजपाचे कमळ

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी बुधवार ५ फेब्रुवारी २०२५ रोजी एका टप्प्यात मतदान झाले. मतमोजणी आज (शनिवार ८ फेब्रुवारी २०२५) होत आहे. आतापर्यंत हाती आलेले कल बघता, भारतीय जनता पार्टी ४० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. यामुळे 'दिल्लीचा कल, फुलले भाजपाचे कमळ' असे म्हणण्याजोगी परिस्थिती आहे. आम आदमी पक्षाचे अनेक उमेदवार पिछाडीवर आहेत. पिछाडीवर असलेल्यांमध्ये 'आप'चे प्रमुख नेते पण आहेत.



दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल (निवडणूक आयोगाचे निकालाचे पान)

दिल्लीत भाजपाची सत्ता आली तर दिल्लीकरांना डबल इंजिन सरकारचा फायदा होईल. दिल्लीतील वाहतूक समस्या, प्रदूषण, शिक्षण, रोजगार आदी समस्या सुटण्यास मदत होईल, असा विश्वास भाजपाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तर अजून निकाल जाहीर झालेला नाही. थोडा वेळ थांबा, अशी प्रतिक्रिया 'आप'चे कार्यकर्ते देत आहेत.



याआधी दिल्लीत मतदानाच्यावेळी गडबड झाल्याची दावा आम आदमी पक्षाने आणि काँग्रेसने केला. पण दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाला अद्याप ठोस पुरावे सादर केलेले नाही. निवडणूक आयोगाने विरोधकांच्या तक्रारींची दखल घेतल्याचे जाहीर केले आणि योग्य शब्दात स्पष्टीकरण लवकरच देणार असल्याचे जाहीर केले. मतमोजणी झाल्यानंतर निवडणूक कशी योग्य प्रकारे झाली, हे स्पष्ट करणारी आकडेवारी देऊ, असे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत. पण आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा आरडाओरडा म्हणून पराभवाची कारणे सांगण्याची पूर्वतयारी असल्याची प्रतिक्रिया भाजपाने दिली आहे.
Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव