'आम आदमी पार्टीत लवकरच फूट पडेल'

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीत लवकरच फूट पडेल, असे भाकीत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केले आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले तर आम आदमी पार्टीचा पराभव झाला. यानंतर केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आम आदमी पार्टीत लवकरच फूट पडेल, असे भाकीत वर्तवले आहे.



भारतीय जनता पार्टीने तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीची निवडणूक जिंकली. यानंतर केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी हे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एकाधिकारशाहीबाबत बोलले. सत्ता होती म्हणून अनेकांनी केजरीवाल यांची एकाधिकारशाही खपवून घेतली. आता केजरीवाल यांच्यावर टीका करण्यास आणि त्यांचे दोष जाहीर करण्यास सुरुवात होईल, असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले.



दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ४३ जागांवर भाजपाचा विजय झाला. तसेच भाजपा पाच जागांवर आघाडीवर आहे. तर २१ जागांवर आपचा विजय झाला आणि ते एका जागेवर आघाडीवर आहे. राष्ट्रीय पक्ष अशी ओळख मिरवणाऱ्या काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकणे जमलेले नाही. काँग्रेसने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत शून्य जागा जिंकण्याची हॅटट्रिक केली. तर आपचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यांनी सत्ता गमावली. माजी मुख्यमंत्री आणि आपचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल तसेच दिल्लीचे माजी शिक्षणमंत्री आणि आपचे संस्थापक सदस्य आणि प्रमुख नेते असलेले मनीष सिसोदिया या दोघांचा पराभव झाला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी या कालकाजी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत जिंकल्या. या निकालावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले की, आम आदमी पार्टीने मागील १० वर्षे दिल्लीकरांची फसवणूक केली. आम आदमी पार्टीने अनेक आश्वासने पूर्ण केली नाही. वेगवेगळ्या योजना जाहीर करुन केजरीवाल आणि त्यांच्या निवडक सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे काम केले, असाही आरोप केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केला.

आतिशी यांना भेटा आणि विचारा मुख्यमंत्री म्हणून त्यांना मिळालेल्या कार्यकाळात निर्णय घेण्यासाठी किती स्वातंत्र्य होते ? या प्रश्नाच्या उत्तरातच केजरीवालांच्या एकाधिकारशाहीची माहिती मिळेल, असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले. दिल्लीच्या निकालाचा परिणाम २०२७ मध्ये पंजाबच्या विधानसभा निवडणुकीवरही दिसू शकतो. भाजपाची पंजाबमधील कामगिरी सुधारू शकते, असेही भाकीत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी वर्तविले.
Comments
Add Comment

NEET Paper Leak 2026 : NEET फेरपरीक्षेसाठी सरकारचा मास्टरप्लॅन! पेपर सुरक्षेसाठी आता थेट वायूदलाची एन्ट्री

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारांमुळे देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर

Ajmer Former Sarpanch Murder Case : अजमेरमध्ये थरकाप उडवणारी घटना! स्कॉर्पिओत माजी सरपंचांसह चौघांना जिवंत जाळलं; अपघाताचा बनाव उघडकीस

अजमेर : राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. माजी सरपंच,

First Indigenous Hydrogen Train : ‘ग्रीन ट्रॅक’वर भारताची झेप! पहिली स्वदेशी हायड्रोजन रेल्वे लवकरच धावणार

नवी दिल्ली : हरित आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीच्या दिशेने भारताने मोठे पाऊल टाकले असून, देशातील पहिली स्वदेशी

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना आवाहन: इंधन बचतीसाठी कारपूलिंगचा अवलंब करा; प्रशासनात शिस्त आणि पर्यावरणपूरक पद्धतींवर भर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना

Twisha Sharma Case : ७ तासांच्या चौकशीनंतर मोठी कारवाई! सासू गिरिबाला सिंह अटकेत; सीबीआयचा तपास वेगात

ट्विशा शर्मा मृत्यू  (Twisha Sharma Case) प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत आरोपी गिरिबाला सिंह यांना अटक केली आहे. उच्च

Ivory Smuggling Racket Busted : भारतीय हस्तिदंत तस्करीचा पर्दाफाश! ४ किलो हत्तीच्या सुळ्यांसह तिघे जेरबंद

कर्नाटक : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) नागपूर विभागीय पथकाने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत भारतीय