Ajit Pawar : आता गाड्यांची तोडफोड कराल तर तुरुंगातच सडावे लागेल; संबंधितांना मोक्का लावण्याचे अजित पवारांचे आदेश

पुणे : पुण्यात सातत्याने गाड्यांची तोडफोडीच्या घटना ऐकायला मिळत आहेत. त्याचबरोबर कोयते घेऊन दहशत पसरवणारी गँग देखील थांबायचे नाव घेत नाही. यावर आता शेवटचा उपाय म्हणून पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पोलीस आयुक्तांना महत्वाचे आदेश दिले आहेत. या तोडफोड गँगला जामीनच मिळणार नाही, असे मोक्काचे कलम लावा, असे स्पष्टपणे सांगितले आहे. पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.


वारंवार तोडफोडीच्या घटना घडत असताना त्यावर कुठलेही नियंत्रण येत नसल्याने अजित पवारांनी थेट पोलीस आयुक्तांवरच प्रश्नांची सरबत्ती केली.




 

बिबवेवाडी परिसरात मध्यरात्री काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी केलेल्या गाड्यांच्या तोडफोडप्रकरणाची पवारांनी दखल घेतली. कोयता गँग, तोडफोड करणाऱ्यांचा बंदोबस्त करा. त्यांच्यावर मोक्का लावा. आरोपींना पकडल्यानंतर त्यांची अशी धिंड काढा की शहराला कळाले पाहिजे की चुकल्यानंतर कायदा कसा असतो. या कार्यक्रमात पुण्याचे पोलीस आयुक्त हवे होते, त्यांना पण सुनावले असते, अशा शब्दांत पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोरच पुणे पोलीस आयुक्तांना इशारा दिला.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी