मुंबई : सध्या अभिनेता राहुल सोलापूरकर हा चर्चेचा विषय झाला आहे. त्याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. या व्हिडिओमध्ये ...
कुंपण घालताना भू संपादन, बॉर्डर गार्ड बांगलादेशने घेतलेल्या हरकती आणि आक्षेप, कामासाठी आवश्यक मर्यादीत हंगाम आणि भूस्खलन/दलदलीच्या जमिनीशी संबंधित आव्हानांना सामोरे जावे लागते. यामुळे कुंपण घालण्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो. पण देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर कुंपण आवश्यक आहे. याच कारणामुळे भारत सरकारने भारत - बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्याचे काम सुरू केले आहे. सीमांचे रक्षण करण्याकरता सीमेलगत कुंपण घालणे हा एक अतिशय महत्वाचा सुरक्षा उपाय आहे. कुंपण घालण्यामुळे सीमेवरील गुन्हेगारी कारवाया, तस्करी, गुन्हेगारांचा संचार आणि शस्त्रास्त्रांची तस्करी या सगळ्याला आळा घालण्यास मदत होणार आहे.
खेड (प्रतिनिधी) : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गांपैकी एका भुयारी मार्गातून वाहतूक सुरू असली तरी येथील दोन्ही ...
आंतरराष्ट्रीय सीमेबाबतच्या नियमांचे पालन करत कुंपण घालण्याचे काम सुरू आहे. भारताच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी कुंपण घातले जात आहे. नियोजनानुसार हे काम केले जाईल, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. कुंपण घालण्याचे काम सुरू असताना भारताचे सीमा सुरक्षा दल (Border Security Force or BSF) हे बांगलादेशच्या बीजीबीच्या (Border Guard Bangladesh or BGB) संपर्कात आहे. समन्वय राखून काम केले जात आहे; असेही केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले.