Kalyan News : अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि हत्या, विशाल - साक्षी तुरुंगात; मुलीच्या घरावर दगडफेक प्रकरणी विशालच्या सहकाऱ्यांना अटक

कल्याण : कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका भागात खाऊ आणायला गेलेल्या चिमुकलीचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी विशाल गवळी आणि त्याची बायको साक्षी गवळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशातच आता विशाल गवळीच्या साथीदारांनी पीडित मुलीच्या घरावर दगडफेक करत दहशतीचे वातावरण पसरवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विशाल गवळीच्या साथीदारांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे.



कल्याण पूर्वेत २३ डिसेंबर २०२४ रोजी १३ वर्षीय चिमुकली खाऊ आणायला गेली मात्र घरी परतलीच नाही. शोधाशोध केल्यानंतर पोलिसांना तिचा मृतदेह हाती लागला. या प्रकरणाने कल्याण- डोंबिवली शहर हादरून गेलं होत. या प्रकरणी विशाल गवळीला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं. चौकशी झाल्यानंतर विशाल गवळीने त्याच्या पत्नीच्या मदतीने हा खून केला असल्याची कबुली दिली. यानंतर त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विशालचा भूतकाळ गुन्हेगारी प्रवृत्तीतला आढळला.


विशाल जरी तुरुंगात असला तरी त्याच्या साथीदारांनी पीडित मुलीच्या घराबाहेर अपरात्री राडा केला. आमच्या माणसांना जामीन झाला नाहीतर एके ४७ बंदूक घेऊन येतो आणि दाखवतो. अशा धमक्या देऊन दगडफेक करत घरासमोरील सामान इतस्ततः फेकून देत पातेले उचलून एका रहिवाशाच्या अंगावर फेकून शिवीगाळ केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांनी या विशाल गवळीच्या साथीदारांना खाकी हिसका दाखवत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी विशाल आणि साक्षी गवळी यांना शिक्षा कधी होणार आणि पीडित मुलीला न्याय मिळणार का याकडे कल्याण वासियांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद