Team India: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारतीय संघाला मोठा झटका

  79

मुंबई: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने(Team India) आपल्याच घरात इंग्लंडला ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत ४-१ असे हरवले. आता रोहित शर्माच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्ध भारत ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. याआधी भारतीय संघात एक मोठा बदल झाला आहे.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला फिटनेसच्या कारणामुळे संघातून बाहेर केले आहे. त्याच्या जागी स्टार स्पिनर वरूण चक्रवर्तीला स्क्वॉडमध्ये सामील करण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेनंतर भारतीय संघाला याच महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये खेळायचे आहे.



अशातच भारतीय संघासाठी हा मोठा झटका असू शकतो. बुमराहला जर आपला फिटनेस सिद्ध करता न आल्याने त्याला बाहेर ठेवण्यात आले आहे. वरूणला सरावासाठी संघात सामील करण्यात आले होते. तसेच रिपोर्ट्समध्येही सांगितले जात आहे की त्याला इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी संघात सामील केले जाईल.


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सामील करण्यात आलेले नाही. दरम्यान, बूम बूम बुमराह या स्पर्धेत खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बुमराहला या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीदरम्यान पाठीच्या मांसपेशी ताणल्याने दुखापत झाली होती. बुमराह स्कॅनसाठी बंगळुरू स्थिती राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पोहोचला आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र