Kerla Story : अंगणवाडीत उपमा नको बिर्याणी किंवा चिकन फ्राय पाहिजे, चिमुकल्याची निरागस मागणी

केरळ : अंगणवाडीत पोषण आहार देण्याचा उद्देश बालकांची भूक आणि कुपोषणाचा सामना करणे हा आहे. अंगणवाडीमध्ये मुलांना पोषण आहार देण्यासोबतच, आरोग्य तपासणी, लसीकरण, आरोग्य संदर्भ सेवा, पोषण आरोग्य विषयक शिक्षण या सेवाही दिल्या जातात.


मुलांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ मुलांसाठी नियोजित केले जातात. अशातच केरळातील एका चिमुकल्याने मला उपमा नको मला बिर्याणी किंवा चिकन फ्राय द्या असं म्हटलं आहे. त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे अंगणवाडी आहारात बदल करण्याचा निर्णय केरळ या राज्याने घेतला आहे.






व्हिडीओमध्ये काय म्हणाला चिमुकला ?


व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील मुलाच नाव थरजूल शंकर आहे. तो त्याच्या आईकडे बिर्याणीसाठी हट्ट करत आहे. त्याचबरोबर तो म्हणाला,"मला अंगणवाडीतला उपमा नको मला बिर्याणी आणि फ्राय चिकन हवं आहे." या निरागस मागणीची दखल केरळच्या महिला बालकल्याण मंत्री वीणा जॉर्ज यांनी घेतली आहे.


वीणा जॉर्ज म्हणाल्या सरकारी नियमाप्रमाणे सकस आहार म्हणून मुलांना अंडी आणि दूध देण्यात येते. आता आम्ही आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न करु, असं त्यांनी म्हटलं आहे. चिमुकल्याची ही मागणी भविष्यात पूर्ण होईल अशी चिन्ह दिसत आहेत.

Comments
Add Comment

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून