Bhutan King In Mahakumbh : भूतानच्या राजांचे त्रिवेणी संगमात स्नान

प्रयागराज : भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक भारताच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज, मंगळवारी प्रयागराजला भेट दिली. याप्रसंगी महाकुंभाच्या निमित्ताने त्यांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. यावेळी त्‍याच्‍यासमवेत उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ होते. दोघांनी गंगेची पूजा आणि आरती केली. यानंतर वांगचुक यांनी अक्षयवटचे दर्शन घेतले.


भूतानचे राजे वांगचूक लखनऊहून विमानाने बामरौली विमानतळावर पोहोचले. याठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्‍वागत केले. अरैल घाटावरून ते होडीने प्रयागराजमधील संगम घाटावर पोहोचले. येथील संगमात त्‍यांनी स्‍नान केले. यानंतर वांगचूक यांनी योगींसोबत पक्ष्यांना खायला दिले आणि त्यांचा फोटोही काढले. पंतप्रधान मोदी ५ फेब्रुवारी रोजी महाकुंभाला भेट देतील. यानंतर हेलिपॅड, योगसेना रेल घाट आणि संगम येथील व्यवस्थेची पाहणी करतील.



दरम्‍यान, गेल्या १३ जानेवारीपासून आतापर्यंत ३७ कोटी लोकांनी पवित्र स्‍नान केले आहे. तर सोमवारी (३ फेब्रुवारी) वसंत पंचमीनिमित्त २ कोटी ३३ लाख लोकांनी महाकुंभात स्नान केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आगामी १० फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे भेट देणार आहेत.

Comments
Add Comment

पश्चिम आशियातील संघर्षावर भारताने दिली अधिकृत प्रतिक्रिया

नवी दिल्ली : इराण आणि आखाती प्रदेशात २८ फेब्रुवारी २०२६ पासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सुरू झाल्याचे समजताच

मध्य पूर्वेतल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेसंदर्भात पूर्णपणे सज्ज

विविध स्रोतांकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम खरेदी, पुरवठ्याच्या स्थितीवर देखरेखीसाठी 24×7 नियंत्रण कक्ष नवी

पुँछमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

नवी दिल्ली : भारतीय शौर्याचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य

खामेनींच्या मृत्यूनंतर भारतात हाय अलर्ट, जम्मू काश्मीरमध्ये बंदोबस्तात वाढ

नवी दिल्ली : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आणि भारतात हाय अलर्ट जाहीर झाला आहे.

धर्मांतराविरुद्ध सर्व देशवासियांनी एकत्र येणं गरजेचं - अमित शाह

शीख पंथाच्या दहा गुरूंनी अशी परंपरा निर्माण केली आहे, जी केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय आहे.

Mumbai Airport: परदेशी प्रवास ठप्प; मुंबई विमानतळावरील १२५ विमानांची उड्डाणं रद्द

मुंबई: मध्यपूर्वेतील इस्राईल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य संघर्षाचा मोठा फटका मुंबईतील