Solapur City : सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉपोरेट कंपनीला ७८४ कोटींचा निधी

सोलापूर : केंद्रशासनाच्या स्मार्ट सिटी अभियान अंतर्गत केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ७८४ कोटींचा निधी सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉपोरेट कंपनीला मिळाला. यामाध्यमातून शहरात ७३१ कोटी रुपये खर्च करून ४६ विकासकामे करण्यात आली. सर्व कामे पूर्ण झाल्याने महापालिकेकडे हस्तांतरीत केली आहेत. निधीही संपला, नवीन कामही नाही. त्यामुळे केंद्राच्या चालू आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये स्मार्ट सिटीच्या निधीला ठेंगा दाखवला आहे. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळण्याची शक्यता आहे.


देशातील दहा स्मार्ट शहरामध्ये सोलापूराचा समावेश होता. केंद्रशासन ७० टक्के राज्य शासन ३० टक्के आणि महापालिकेचा हिस्सा १० टक्के हिस्सा या माध्यमातून शहरात विकासकामे केली जाणार होती. यामध्ये ४६ विकास कामाचा डिपीआर तयार करण्यात आला. यातील समांतर जलवाहिनी वगळता सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीने सर्व कामे महापालिकेकडे हस्तांतरीत केली आहेत.



असा मिळाला निधी



केंद्र शासनाकडून या योजनासाठी ३९२ कोटी, राज्यशासन १९६ कोटी, महापालिकेचा हिस्सा १९६ कोटी, असा एकूण ७८४ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ७३१ कोटींचा निधी खर्च झाला आहे. ५२.७१ कोटींचा निधी शिल्लक आहे. त्यातून इतर कामे चालू आहेत.



मार्चअखेर सगळे संपणार


स्मार्ट सिटी प्रशासनाच्या माध्यमतून उजनी समांतर जलवाहिनीचे काम चालू आहे. ३१ मार्च अखेर मक्तेदाराला मुदत वाढ दिल्याने काम संपणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या सीईओंची दोन महिन्यांसाठी शासनाने नियुक्ती केली आहे. त्यामुळे मार्चअखेर सोलापूर स्मार्ट सिटीचा बाजार उठणार असल्याचे बोलले जात आहे.


Comments
Add Comment

थंडी संपताच महाराष्ट्रात जाणवू लागलाय उन्हाचा तडाखा

मुंबई : थंडी सरत आली आहे. आणि हवामानात बदल जाणवायला लागला आहे. मार्च मधल्या आल्हाददायक वातावरणात उकाडा जाणवायला

CH. SAMBHAJINAGAR : MGM Hospital परिसरात नायजेरियन तरुणांकडून महिलेची छेडछाड आणि मारहाण

छत्रपती संभाजीनगर: शहरातील MGM Hospital परिसरात एका महिलेची छेडछाड व मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या

Malegaon Namaz Pathan : मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण, सात जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस