Solapur City : सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉपोरेट कंपनीला ७८४ कोटींचा निधी

  80

सोलापूर : केंद्रशासनाच्या स्मार्ट सिटी अभियान अंतर्गत केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ७८४ कोटींचा निधी सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉपोरेट कंपनीला मिळाला. यामाध्यमातून शहरात ७३१ कोटी रुपये खर्च करून ४६ विकासकामे करण्यात आली. सर्व कामे पूर्ण झाल्याने महापालिकेकडे हस्तांतरीत केली आहेत. निधीही संपला, नवीन कामही नाही. त्यामुळे केंद्राच्या चालू आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये स्मार्ट सिटीच्या निधीला ठेंगा दाखवला आहे. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळण्याची शक्यता आहे.


देशातील दहा स्मार्ट शहरामध्ये सोलापूराचा समावेश होता. केंद्रशासन ७० टक्के राज्य शासन ३० टक्के आणि महापालिकेचा हिस्सा १० टक्के हिस्सा या माध्यमातून शहरात विकासकामे केली जाणार होती. यामध्ये ४६ विकास कामाचा डिपीआर तयार करण्यात आला. यातील समांतर जलवाहिनी वगळता सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीने सर्व कामे महापालिकेकडे हस्तांतरीत केली आहेत.



असा मिळाला निधी



केंद्र शासनाकडून या योजनासाठी ३९२ कोटी, राज्यशासन १९६ कोटी, महापालिकेचा हिस्सा १९६ कोटी, असा एकूण ७८४ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ७३१ कोटींचा निधी खर्च झाला आहे. ५२.७१ कोटींचा निधी शिल्लक आहे. त्यातून इतर कामे चालू आहेत.



मार्चअखेर सगळे संपणार


स्मार्ट सिटी प्रशासनाच्या माध्यमतून उजनी समांतर जलवाहिनीचे काम चालू आहे. ३१ मार्च अखेर मक्तेदाराला मुदत वाढ दिल्याने काम संपणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या सीईओंची दोन महिन्यांसाठी शासनाने नियुक्ती केली आहे. त्यामुळे मार्चअखेर सोलापूर स्मार्ट सिटीचा बाजार उठणार असल्याचे बोलले जात आहे.


Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या