सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नियोजित ४०० कोटींचा विकास आराखडा मंजूर

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न


कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची प्रथम बैठक खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत व पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा अधिक विकसित व्हावा, विकासकामांना वेग यावा, अशी अपेक्षा असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यावेळी म्हणाले.



सिंधुदुर्ग जिल्हा आणखी विकसित आणि प्रगत बनविण्यासाठी सामूहिक जबाबदारीने काम करूया, असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले. जनतेच्या हितासाठी सुरू केलेल्या शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचवा. शेती, पर्यटन, पशुसंवर्धन या माध्यमातून जिल्ह्याचे अर्थकारण वाढवण्यावर भर द्यायला हवा. जिल्हा नियोजन बैठकीत मांडलेले प्रश्न प्राधान्याने सोडवावेत अशा सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नियोजित ४०० कोटींचा विकास आराखडा या बैठकीत मंजूर करण्यात आला.



यावेळी आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार, नियोजन अधिकारी बुधावले आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात