सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नियोजित ४०० कोटींचा विकास आराखडा मंजूर

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न


कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची प्रथम बैठक खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत व पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा अधिक विकसित व्हावा, विकासकामांना वेग यावा, अशी अपेक्षा असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यावेळी म्हणाले.



सिंधुदुर्ग जिल्हा आणखी विकसित आणि प्रगत बनविण्यासाठी सामूहिक जबाबदारीने काम करूया, असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले. जनतेच्या हितासाठी सुरू केलेल्या शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचवा. शेती, पर्यटन, पशुसंवर्धन या माध्यमातून जिल्ह्याचे अर्थकारण वाढवण्यावर भर द्यायला हवा. जिल्हा नियोजन बैठकीत मांडलेले प्रश्न प्राधान्याने सोडवावेत अशा सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नियोजित ४०० कोटींचा विकास आराखडा या बैठकीत मंजूर करण्यात आला.



यावेळी आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार, नियोजन अधिकारी बुधावले आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी