सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नियोजित ४०० कोटींचा विकास आराखडा मंजूर

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न


कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची प्रथम बैठक खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत व पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा अधिक विकसित व्हावा, विकासकामांना वेग यावा, अशी अपेक्षा असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यावेळी म्हणाले.



सिंधुदुर्ग जिल्हा आणखी विकसित आणि प्रगत बनविण्यासाठी सामूहिक जबाबदारीने काम करूया, असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले. जनतेच्या हितासाठी सुरू केलेल्या शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचवा. शेती, पर्यटन, पशुसंवर्धन या माध्यमातून जिल्ह्याचे अर्थकारण वाढवण्यावर भर द्यायला हवा. जिल्हा नियोजन बैठकीत मांडलेले प्रश्न प्राधान्याने सोडवावेत अशा सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नियोजित ४०० कोटींचा विकास आराखडा या बैठकीत मंजूर करण्यात आला.



यावेळी आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार, नियोजन अधिकारी बुधावले आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!