हत्ती आले आणि लाखो रुपयांच्या शेतीची वाट लावून गेले

  76

सिंधुदुर्ग : केर गावात सकाळी पाच हत्तींच्या कळपाने धुडगूस घातला. शेतकरी चंद्रकांत देसाई यांच्या मालकीच्या केळी सुपारी आदी सह अन्य झाडांची मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. केर गावातच हत्तींनी ठाण मांडले असल्याने ऐन हंगामात काजू बाग बहरत असताना शेती बागायती फिरणे मुश्किल झाले आहे.आसपास जंगलात जाणेही शक्य होत नाही त्यामुळें जळणासाठी लागणारे सरण (लाकडे) कसे आणावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ना पिक, ना उत्पन्न, अशी अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे.



जीवापाड मेहनत करून वाढविलेली बागायती पिके हत्तींनी उध्वस्त करून लाखो रुपयांची नुकसानी केली आहे. ग्रामीण भागातील उदरनिर्वाह हा काजू,आंबा, सुपारी नारळ,केळी आदींवर अवलंबून असतो. मात्र तेच उत्पन्न हातातोंडाशी आले असताना घास हिरावून घेतला जात आहे. या संकटावर उपाय करण्यासाठी वन विभागाने सक्रीय व्हावे, हत्ती पकडून घनदाट जंगलात रवाना करावे, हत्तींचा योग्य पद्धतीने बंदोबस्त करावा; अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी