मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी सेवा महागली

मुंबई : मुंबईत शनिवार १ फेब्रुवारी २०२५ पासून रिक्षा आणि टॅक्सी सेवा महाग झाली आहे. आधी संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात (Mumbai Metropolitan Region) अर्थात एमएमआरमध्ये किमान रिक्षा भाडे २३ रुपये आणि किमान टॅक्सी भाडे २८ होते. आता एमएमआरमध्ये किमान रिक्षा भाडे २६ रुपये आणि किमान टॅक्सी भाडे ३१ रुपये झाले आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई महानगर क्षेत्रात कूल कॅबचे किमान भाडे आता ४८ रुपये झाले आहे. आधी कूल कॅबचे किमान भाडे ४० रुपये होते. कूल कॅबच्या किमान भाड्यात आठ रुपयांची वाढ झाली आहे.



किमान भाडे हे पहिल्या दीड किमी अंतरासाठी लागू होते. किमान अंतरापुढील प्रत्येक किमी. साठी रिक्षाचे किमान भाडे आधी १५.३३ रुपये होते ते आता १७.१४ रुपये झाले आहे. तसेच किमान अंतरापुढील प्रत्येक किमी. साठी टॅक्सीचे किमान भाडे आधी १८.६६ रुपये होते ते आता २०.६६ रुपये झाले आहे. याच पद्धतीने किमान अंतरापुढील प्रत्येक किमी. साठी कूल कॅबचे किमान भाडे आधी २६.७१ रुपये होते ते आता ३७.२० रुपये झाले आहे.

मीटर रिकॅलिब्रेट केल्यानंतर नवा दर संबंधित रिक्षा, टॅक्सी, कूल कॅबला लागू होणार आहे. जोपर्यंत मीटर रिकॅलिब्रेट होत नाही तोपर्यंत जुन्या दराने संबंधित रिक्षा, टॅक्सी, कूल कॅब सेवा उपलब्ध असेल. सध्या मुंबईत सुमारे तीन लाख रिक्षा आणि १५ हजार टॅक्सी आहेत. यामुळे सर्व रिक्षांसाठी मीटर रिकॅलिब्रेट करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

महापुरुषांची नावे संक्षिप्त घेणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना नगरसेवकांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने जोगेश्वरी रुग्णालयाचे नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब

महापालिका शाळांमधील न्युट्रीबार वादात; मध्यान्ह भोजनात इस्कॉनच्या खिचडीची झाली मागणी

मुंबई: मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना पोषक आहारांतर्गत देण्यात येणाऱ्या न्युट्रीबारच्या वाटपाबाबत आता

मुंबईतील टँकर माफियांची लॉबी नष्ट करा; महापालिका सभागृहात सर्वच नगरसेवकांची एकमुखी मागणी

मुंबई: मुंबईत सध्या पाण्याची काही भागांमध्ये समस्या निर्माण झाली असून ही टंचाई फक्त आणि फक्त टँकर माफियांसाठी

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात