मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी सेवा महागली

मुंबई : मुंबईत शनिवार १ फेब्रुवारी २०२५ पासून रिक्षा आणि टॅक्सी सेवा महाग झाली आहे. आधी संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात (Mumbai Metropolitan Region) अर्थात एमएमआरमध्ये किमान रिक्षा भाडे २३ रुपये आणि किमान टॅक्सी भाडे २८ होते. आता एमएमआरमध्ये किमान रिक्षा भाडे २६ रुपये आणि किमान टॅक्सी भाडे ३१ रुपये झाले आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई महानगर क्षेत्रात कूल कॅबचे किमान भाडे आता ४८ रुपये झाले आहे. आधी कूल कॅबचे किमान भाडे ४० रुपये होते. कूल कॅबच्या किमान भाड्यात आठ रुपयांची वाढ झाली आहे.



किमान भाडे हे पहिल्या दीड किमी अंतरासाठी लागू होते. किमान अंतरापुढील प्रत्येक किमी. साठी रिक्षाचे किमान भाडे आधी १५.३३ रुपये होते ते आता १७.१४ रुपये झाले आहे. तसेच किमान अंतरापुढील प्रत्येक किमी. साठी टॅक्सीचे किमान भाडे आधी १८.६६ रुपये होते ते आता २०.६६ रुपये झाले आहे. याच पद्धतीने किमान अंतरापुढील प्रत्येक किमी. साठी कूल कॅबचे किमान भाडे आधी २६.७१ रुपये होते ते आता ३७.२० रुपये झाले आहे.

मीटर रिकॅलिब्रेट केल्यानंतर नवा दर संबंधित रिक्षा, टॅक्सी, कूल कॅबला लागू होणार आहे. जोपर्यंत मीटर रिकॅलिब्रेट होत नाही तोपर्यंत जुन्या दराने संबंधित रिक्षा, टॅक्सी, कूल कॅब सेवा उपलब्ध असेल. सध्या मुंबईत सुमारे तीन लाख रिक्षा आणि १५ हजार टॅक्सी आहेत. यामुळे सर्व रिक्षांसाठी मीटर रिकॅलिब्रेट करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य