आनंदाची बातमी, व्यावसायिक सिलिंडर झाला स्वस्त

नवी दिल्ली : देशाचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच एक आनंदाची बातमी आली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात सात रुपयांची कपात झाली आहे. यामुळे १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर जो राजधानी दिल्लीत १८०४ रुपयांत उपलब्ध होता तो आता १७९७ रुपयांत मिळेल. किमतीतील कपातीमुळे १९ किलोचा एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या व्यावसायिकांचा एलपीजीवरील खर्चात कमी होण्यास मदत होणार आहे.



जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाच्या दरातले बदल आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यांच्याआधारे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी, एलपीजी यांचे दर निश्चित होत असतात. पेट्रोल, डिझेलचे दर दररोज सकाळी तेल कंपन्या जाहीर करतात. तर सीएनजी, पीएनजी यांच्या दरात अधूनमधून बदल होतात. हे बदल संबंधित कंपन्यांकडून जाहीर केले जातात. एलपीजीचा दर साधारणपणे दर महिन्याच्या एक तारखेला जाहीर केला जातो. या व्यवस्थेनुसार कंपन्यांनी शनिवार १ फेब्रुवारी रोजी दरांबाबत घोषणा केली. कंपन्यांच्या घोषणेनुसार आता व्यावसायिक सिलिंडर सात रुपयांनी स्वस्त झाला आहे. याआधी डिसेंबर २०२४ मध्ये कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ६२ रुपयांची वाढ केली होती.

स्थानिक कर आणि वाहतूक खर्च यामुळे कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरात राज्यानुसार बदल होतात. एलपीजीच्या किमती राज्यानुसार बदलतात. हा बदल किरकोळ असला तरी कमी झालेल्या दरांमुळे देशभरातली एलपीजीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना फायदा होईल.

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी सेवा महागली

मुंबईत शनिवार १ फेब्रुवारी २०२५ पासून रिक्षा आणि टॅक्सी सेवा महाग झाली आहे. आधी संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात अर्थात एमएमआरमध्ये किमान रिक्षा भाडे २३ रुपये आणि किमान टॅक्सी भाडे २८ होते. आता एमएमआरमध्ये किमान रिक्षा भाडे २६ रुपये आणि किमान टॅक्सी भाडे ३१ रुपये झाले आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ झाली आहे.
Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी