शिवसेना उद्धव ठाकरेंना पुण्यात देणार मोठा धक्का ?

  80

पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पुण्यात मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच उद्धव ठाकरेंच्या पक्षातून अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे मुंबईत सभा घेऊन स्वबळाची तयारी करत असल्याचे संकेत देत आहेत. पण त्यांच्या पक्षात स्वबळाएवढी ताकद उरणार का ? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.



पुण्याचे माजी आमदार महादेव बाबर उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून फेब्रुवारी महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेवेळी उद्योगमंत्री उदय सामंत पण उपस्थित होते. यानंतरच पुण्यात उद्धव ठाकरेंना धक्का बसणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.



महादेव बाबर यांच्यासोबत पुण्यातील काही नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे. महादेव बाबर यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्यात आले नव्हते. त्यामुळे ते नाराज होते. त्यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. पण महाविकास आघाडीतडून अंतिम क्षणी प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिल्याने बाबर यांना माघार घ्यावी लागली होती. यामुळेच नाराज झालेल्या महादेव बाबर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.



अलिकडेच दिल्लीत राहणारे अब्जाधीश अभिषेक वर्मा आणि त्यांच्या पत्नीने शिवसेनेत प्रवेश केला. बरीच वर्षे अभिषेक यांचे आई आणि वडील खासदार होते. हिंदुत्ववादी पक्ष म्हणून अभिषेक वर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. अभिषेक वर्मा हे शिवसेनेसाठी दिल्लीत राष्ट्रीय समन्वयक (नॅशनल कोऑर्डिनेटर) म्हणून काम करणार आहेत.
Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक