आदित्य ठाकरेंनी मारली दांडी, शासकीय बैठकीत उद्धव सेनेची कोंडी

मुंबई : मुंबई शहरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक झाली. या बैठकीला मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व आमदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात भलतेच घडले. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व आमदार बैठकीला आले. पण वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारली. यामुळे नेत्याविना संघ मैदानात उतरल्यासारखी अवस्था उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या आमदारांची झाली.



पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांच्या शहर नियोजनाशी संबंधित तक्रारी आणि मागण्या जाणून घेतल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. पुढील बैठकीआधी जास्तीत जास्त प्रश्न सुटावेत यासाठी प्रशासनाला आवश्यक ते निर्देश दिले.

बैठकीत लोकप्रतिनिधींनी ६९० कोटी रुपयांच्या विकासनिधीची मागणी केली. झोपडपट्टी विकासासाठी २२५ कोटी, रुग्णालयांसाठी ८५ कोटी, पोलीस वसाहती आणि स्थानकांसाठी ६३ कोटी, गडकिल्ले विकासासाठी २० कोटी आणि कुलाबा कॉझवेच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मागण्यात आला. बैठकीआधी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभादेवी परिसराचा दौरा केला. या दौऱ्याबाबत पालकमंत्री शिंदे आणि माहीम मतदारसंघाचे आमदार महेश सावंत यांच्यात चर्चा झाली. शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्याशी पालकमंत्र्यांनी गिरणी कामगारांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. काँग्रेसच्या धारावीच्या आमदार ज्योती गायकवाड यांच्याशी पालकमंत्र्यांनी सायनचा पूल या विषयावर चर्चा केली. वरळीचे आमदार गैरहजर होते. यामुळे पालकमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकारी आणि इतर लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा करुन वरळी मतदारसंघांतील प्रश्नांची माहिती घेतली.

मुंबईकरांच्या प्रश्नांवर चर्चा

मुंबईकरांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यात म्हाडा, एसआरए, महानगरपालिका, कायदा आणि सुव्यवस्था, बीपीटी, आरोग्य विभाग, रस्ते, पाणीपुरवठा अशा सर्वच मूलभूत सोयीसुविधांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन ते सोडवावेत आणि लेखी उत्तरे संबंधित लोकप्रतिनिधींना पाठवावी असे निर्देश यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई शहरात जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा आणि पुनर्वसन रखडलेल्या इमारतींचा प्रश्न गंभीर असून तो सोडवण्यासाठी समूह पुनर्विकास हाच पर्याय आहे. त्याद्वारे घरांसोबत प्राथमिक सोयीसुविधा देखील रहिवाशांना उपलब्ध करून देता येतील, त्यामुळे सामूहिक पुनर्वसन योजना राबवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सात यंत्रणांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील असेही यावेळी पालकमंत्री शिंदेंनी स्पष्ट केले. यासोबतच शहरातील पाण्याचा प्रश्न तसेच वायू प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
Comments
Add Comment

'दावोस'मधील करारांच्या अंमलबजावणीसाठी १० अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी १० प्रकल्प

मुख्यमंत्र्यांचे निर्देश; जमीन वाटप आणि परवानग्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई : स्वित्झर्लंडच्या

Metro 3 : मेट्रो ३ सेवा पूर्ववत, प्रशासनाने मागितली प्रवाशांची माफी

मुंबई : लोकल ट्रेन प्रमाणेच मेट्रो सेवेलाही मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जात आहे. आरे – कफ परेड मेट्रो ३

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीएसआर निधीतून नायर रुग्णालयात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अँनालायझर; रुग्णांना जलद व अचूक निदान सेवा मुंबई: मुंबईतील टोपीवाला नॅशनल

Harbour Line AC Local Train : मुंबईकरांचा AC लोकलकडे वाढता कल! हार्बर लाईनवरील प्रवासी संख्या तब्बल ६५ टक्क्यांनी वाढली

मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) हार्बर मार्गावरील वातानुकूलित उपनगरी लोकल सेवांना मुंबईकरांकडून मोठा प्रतिसाद

आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ विकसित करण्यासाठी कार्यवाही सुरू करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश • मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापन राज्यस्तरीय आढावा बैठक •

पेट्रोल-डिझेलच्या साठेबाजीवर बारीक लक्ष ठेवा

मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; 'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर सरकारचा ऍक्शन प्लॅन तयार मुंबई :