Buldhana News : अरे देवा! केस गळतीनंतर आता बुलढाण्यातील गावक-यांना आता दृष्टीदोष!

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मध्ये गेले कित्येक दिवसांपासून डोक्याला खाज येऊन केस गळतीचा प्रकार सुरु आहे. या समस्येनंतर गावकऱ्यांसमोर नवीन आवाहन उभं राहीलं आहे. केस गळतीनंतर आता गावकऱ्यांमध्ये दृष्टिदोष आढळून येत असल्याची माहिती समोर आली आहे. यामागचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे.



आधी डोक्याला खाज सुटणं, नंतर केस गळून सरळ हातात येणं आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडणं, यामुळेच नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरले होते. या घटनेची चर्चा देशभर सुरु झाल्याचे पाहायला मिळाले होते. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांचे केस गळू लागल्याने या गावातील लोकांची समस्या राष्ट्रीय समस्या ठरली होती. अशातच आता इथल्या नागरिकांमध्ये दृष्टिदोष आढळून येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.



या घटनेने गावकरी हादरले आहेत. केस गळतीच्या समस्येवर उपाय म्हणून लावलेल्या तेलाने गावकऱ्यांना हा त्रास होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या गावात ज्यांना टक्कल पडले त्यांची नजर कमजोर होत आहे. दरम्यान या समस्येवर गावकऱ्यांकडून तात्काळ निदान शोधण्यासाठी मागणी केली जात आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद