Mumbai Bike Taxi : मुंबईत सुरु होणार बाईक टॅक्सी,परिवहनमंत्र्यांची घोषणा!

मुंबई : राज्याला लागलेल्या प्रदूषणाची झळ कायम असताना काही दिवसांपूर्वी मुंबईत टप्प्याटप्प्याने पेट्रोल - डिझेलवर चालणाऱ्या गाड्या बंद करून इलेक्ट्रिक गाड्या चालू केल्या जाणार असल्याची चर्चा सुरु होती. अशातच आता राज्यात वाहतुकीच्या सुविधा वाढवण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन महिन्यांत मुंबईत उबर, ओला टॅक्सी सारख्या बाईक टॅक्सी सेवा चालू केल्या जाणार आहेत. बाइक टॅक्सीसाठी परवाने देण्याचे कामही सुरू होणार असून, महिला प्रवाशांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



मुंबईत दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असून त्या तुलनेत सध्या उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने अपुरी पडत आहेत. त्यामुळेच ज्या ठिकाणी वाहतुकीचे पर्याय आणि सोयी कमी आहेत किंवा वाहतूककोंडी होते अशा ठिकाणी बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात यावी, अशी सूचना झा समितीच्या अहवालात करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने ग्रामीण भागासह शहरी भागातही बाईक टॅक्सी चालविण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार आता मुंबईत बाईक टॅक्सी सुरू करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढच्या दोन महिन्यांत रॅपिडोसारखी बाईक टॅक्सीसेवा मुंबईत सुरू होणार आहे. बाईक टॅक्सी सुरू करताना महिला प्रवाशांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे.



बुधवारी याबाबत अधिक माहिती देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले, ओला-उबरप्रमाणेच मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार. मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाल्यावर ठाणे आणि इतर महानगरांमध्ये ही सुविधा सुरू होऊ शकते. असे असले तरी बाईक टॅक्सीसाठी अनुकूल वातावरण असले तरी रिक्षा, टॅक्सीचालक संघटनांचा याला विरोध आहे.


मात्र या योजनेने प्रवाशांना जास्त वेळ खर्चिक घालून वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार नाही. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि अधिक झटपट होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

मुंबईत ‘सायप्रस ट्रेड सेंटर’ उभारणार

राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची घोषणा; बिझनेस फोरममध्ये भारत-सायप्रस दरम्यान सहा सामंजस्य

Mangrove Park in Gorai : गोराईत राज्याच्या पहिल्या 'कांदळवन पार्क'चे २८ मे रोजी उद्घाटन; निसर्गप्रेमींना मिळणार विरंगुळ्याचे नवे ठिकाण

मुंबई : अनेक दिवसांच्या आणि वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईकरांना निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळा

कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र आणि दक्षिण कोरियामध्ये करार

राज्यातील युवकांना मिळणार जागतिक दर्जाच्या संधी; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्र्यातील दगडफेक प्रकरण तापलं! गरिब नगरमधून १६ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरातील गरिब नगर येथे झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत १६ जणांना

मराठा तरुणांच्या उद्योग उभारणीला फडणवीस सरकारकडून बळ

अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी १५० कोटींचा निधी वितरित मुंबई : फडणवीस सरकारने मराठा समाजातील तरुण उद्योजकांना

Mumbai : वांद्रे पूर्वेतील झोपडपट्टीवर सलग तिसऱ्या दिवशी धडक कारवाई; रेल्वेकडून विस्तीर्ण भूखंड मोकळा

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व (Mumbai Bandra East) रेल्वे स्थानकालगत असलेल्या 'गरीब नगर' (Garib Nagar) झोपडपट्टीवर प्रशासनाचा