Ranji Trophy 2025 : विराटला रणजी सामना खेळताना पाहण्यासाठी अरुण जेटली स्टेडियमवर तुफान गर्दी

नवी दिल्ली : रणजी करंडक स्पर्धेत खेळणाऱ्या विराट कोहलीला पाहण्यासाठी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर तुफान गर्दी जमली होती.यामुळे स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यात पोलिसांच्या गाडीचेही नुकसान झाले. तर काही फॅन्स जखमी झाले आहेत.



रणजी करंडक स्पर्धेत रेल्वेविरुद्धच्या सामन्यात कोहलीने १२ वर्षात प्रथमच प्रथम श्रेणी स्पर्धेत मैदानात पुनरागमन केले. आपल्या आवडत्या स्टारला पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने स्टेडियमबाहेर आले होते. फॅन्स पाहाटे ३ वाजल्यापासून स्टेडियमच्या गेट नंबर १६ समोर उभे होते. तेथील सुरक्षारक्षकांसाठी हे सारं अनपेक्षित होतं. त्यामुळे स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये काही चाहते जखमी झाल्याने गोंधळ उडाला. हा जमाव एकमेकांना ढकलत होता आणि ज्यामुळे एंट्री गेटजवळ दोन पंखे पडले आणि चाहते जखमी झाले. पोलिसांच्या दुचाकीचे नुकसान झाले आणि अनेकांचे बूट मागे राहिले. या गोंधळात किमान तीन जण जखमी झाले.



विराट कोहली १२ वर्ष ८६ दिवसानंतर रणजी करंडक स्पर्धेत खेळतोय. विराटने त्याचा २३वा रणजी करंडक स्पर्धेतील सामना वयाच्या २४व्या वर्षी खेळला होता आणि त्यानंतर ३६ वर्ष ८६ दिवसांचा विराट आज २४वा रणजी सामना खेळतोय. त्याला पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी गर्दीच्या परिस्थितीत गुदमरू नये म्हणून आपल्या मुलांना खांद्यावर उचलले होते. शेवटी जेव्हा गेट उघडले तेव्हा सुरक्षा अधिकाऱ्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जखमींना मदत करण्यासाठी ठोस प्रयत्न केले.


Comments
Add Comment

Vidarbha Railway: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र

गोंदिया-जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी

महाराष्ट्रासह चार राज्यात मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली

पोखरणमध्ये भारताचे हवाई दल करणार 'ऑपरेशन वायुशक्ती'

पोखरण : भारतीय हवाई दल राजस्थानमधील पोखरण येथे २७ फेब्रुवारी रोजी 'ऑपरेशन वायुशक्ती' अंतर्गत युद्धसराव अर्थात

संसदीय मुत्सद्देगिरीत डॉ. श्रीकांत शिंदेंची एन्ट्री; इंडोनेशियासोबतच्या संबंधांचे करणार सारथ्य

नवी दिल्ली : भारताची 'संसदीय मुत्सद्देगिरी' (Legislative Diplomacy) जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष मा. ओम

Kerala To Be Renamed : केरळचे नाव बदलून केरळम होणार? राज्य निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता

केरळचे नाव बदलून केरळम करण्याचे विधेयक आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे, जो

AI ​​Impact Summit मधील आंदोलन प्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षाला अटक

नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमधील भारतीय युवा काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली