Ranji Trophy 2025 : विराटला रणजी सामना खेळताना पाहण्यासाठी अरुण जेटली स्टेडियमवर तुफान गर्दी

  69

नवी दिल्ली : रणजी करंडक स्पर्धेत खेळणाऱ्या विराट कोहलीला पाहण्यासाठी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर तुफान गर्दी जमली होती.यामुळे स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यात पोलिसांच्या गाडीचेही नुकसान झाले. तर काही फॅन्स जखमी झाले आहेत.



रणजी करंडक स्पर्धेत रेल्वेविरुद्धच्या सामन्यात कोहलीने १२ वर्षात प्रथमच प्रथम श्रेणी स्पर्धेत मैदानात पुनरागमन केले. आपल्या आवडत्या स्टारला पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने स्टेडियमबाहेर आले होते. फॅन्स पाहाटे ३ वाजल्यापासून स्टेडियमच्या गेट नंबर १६ समोर उभे होते. तेथील सुरक्षारक्षकांसाठी हे सारं अनपेक्षित होतं. त्यामुळे स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये काही चाहते जखमी झाल्याने गोंधळ उडाला. हा जमाव एकमेकांना ढकलत होता आणि ज्यामुळे एंट्री गेटजवळ दोन पंखे पडले आणि चाहते जखमी झाले. पोलिसांच्या दुचाकीचे नुकसान झाले आणि अनेकांचे बूट मागे राहिले. या गोंधळात किमान तीन जण जखमी झाले.



विराट कोहली १२ वर्ष ८६ दिवसानंतर रणजी करंडक स्पर्धेत खेळतोय. विराटने त्याचा २३वा रणजी करंडक स्पर्धेतील सामना वयाच्या २४व्या वर्षी खेळला होता आणि त्यानंतर ३६ वर्ष ८६ दिवसांचा विराट आज २४वा रणजी सामना खेळतोय. त्याला पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी गर्दीच्या परिस्थितीत गुदमरू नये म्हणून आपल्या मुलांना खांद्यावर उचलले होते. शेवटी जेव्हा गेट उघडले तेव्हा सुरक्षा अधिकाऱ्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जखमींना मदत करण्यासाठी ठोस प्रयत्न केले.


Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके