Pune GBS Patient : राज्यात आणखी एक GBS चा बळी!

  93

पुणे : कोरोनानंतर आता राज्यात GBS व्हायरसची दहशत निर्माण झाली आहे. GBS ने पुण्यात थैमान घातले आहे. आज पुण्यातील GBS बाधित रुग्णांची संख्या १२७ पर्यंत पोहचली आहे. जीबीएस आजारामुळे राज्यात दुसरा बळी गेलाय. पहिला मृत्यू सोलापूरमध्ये झाला होता, तर दुसरा मृत्यू पुण्यात झाला आहे.


पुण्यात बुधवारी GBS बाधित असलेल्या एका ५६ वर्षीय महिलेचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. राज्यात जीबीएसची रुग्णसंख्या आता १२७ झाली असून, त्यातील २० जण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यातील रुग्णांमध्ये २३ रुग्ण हे पुणे महापालिका क्षेत्रातील असून, ७३ रुग्ण हे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील आहेत.



'हा' आजार होण्यामागचे कारण ??


हा आजार स्पर्शाने किंवा एकमेकांचं उष्ट खाल्ल्याने होत नसून हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची व्यवस्थित चौकशी केल्यानंतर कूपनलिका तसेच विहिरीतून मिळणाऱ्या दूषित पाण्यामुळे हा आजार संभवतो असल्याचे समजते आहे. या पार्श्वभूमीवर गुलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून २५ हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच नागरिकांना पाणी उकळून व गाळून घेणे, बाहेरील अन्नपदार्थ टाळणे याबाबत आवाहनही करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या