GBS Patient : जीबीएसचे सोलापुरात ५ संशयित रुग्ण; औषधे व यंत्रांसाठी २ कोटींचा निधी

  62

सोलापूर : जीबीएस (गुलियन बॅरे सिंड्रोम)चे जिल्ह्यात संशयित पाच रूग्ण असून त्यातील एक रूग्ण बरा झाला आहे. सध्या उपचार घेत असलेले चारही जीबीएस संशयित रूग्ण जिल्ह्याबाहेरचे आहेत. औषधे व यंत्रांसाठी दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून आवश्‍यकता भासल्यास आणखी निधी उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.



जीबीएस आजाराबाबत लोकांत गैरसमज व संभ्रम आहे. हा आजार संसर्गजन्य नाही. तो होऊ नये, यासाठी नागरिकांनी स्वच्छ, शुद्ध पाणी व पूर्णपणे शिजवलेल्या आहाराचे सेवन करावे. रुग्णांवरील उपचारासाठी जिल्‍ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असून रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येईल. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून दोन कोटींचा निधी दिला आहे. पुरेसा निधी उपलब्ध असून आवश्‍यकता भासल्यास आणखी निधी उपलब्ध करण्यात येईल. सर्वजण मिळून याविरोधात लढूया, जिंकूया, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले उपस्थित होते.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या