Emergency : कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटामागची साडेसाती काही सुटेनाच!

'इमर्जन्सी' पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात


मुंबई : बॉलीवूड क्विन ओळख असलेल्या कंगनाचा नुकताच इमर्जन्सी चित्रपट रिलीज झाला आहे. वादाच्या भोवऱ्यात असलेला इमर्जन्सी खूप प्रयत्नांनी हिरवा सिग्नल मिळाल्यावर रिलीज झाला होता. मात्र रिलीज झाल्यानंतरही त्याची साडेसाती कायम आहे. पुन्हा एकदा 'इमर्जन्सी' चित्रपटावर कॉपी राईट चा दावा करण्यात आला आहे.



कंगना रणौत दिग्दर्शित इमर्जन्सी चित्रपट १७ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात कंगना स्वतः इंदिरा गांधी यांच्या पेहरावात दिसत आहे. 'इमर्जन्सी' प्रदर्शित होण्याआधीच कंगनाला खूप अडथळ्यांना सामोरे जावं लागलं आहे. हा सिनेमा २०२४ मध्ये जून महिन्यात रिलीज होणार होता. पण, तो वादात अडकला होता. परंतु काही सीन्स कट केल्यानंतर सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दिला. मात्र असं असलं तरी आता इमर्जन्सी नव्या वादात अडकला आहे. 'इमर्जन्सी'वर २६ जानेवारी १९५० रोजी लिहिलेल्या राष्ट्रीय कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या 'जनतंत्र का जन्म' या कवितेतील 'सिंघासन खाली करो की जनता आती है' ही ओळ परवानगीशिवाय वापरल्याचा आरोप आहे. ही ओळ नंतर दिनकर यांच्या प्रसिद्ध पुस्तक नील कुसुममध्ये समाविष्ट करण्यात आली. या पुस्तकाचे कॉपीराइट स्वप्ना सिंह यांच्याकडे आहेत. हे गाणं मनोज मुंतशीर यांनी लिहिलंय.


२६ ऑगस्ट २०२४ रोजी, चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, ही ओळ चित्रपटात असल्याचं उघड झालं. अशा परिस्थितीत, ३१ ऑगस्ट २०२४ रोजी चित्रपट निर्मात्याला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. पण निर्मात्यांनी यावर कोणतेही उत्तर दिलं नाही. त्यामुळे आता इमर्जन्सी नव्याने वादात अडकली आहे. दरम्यान चित्रपटाच्या मागची तिढा सुटणार कि वाढणारं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Comments
Add Comment

Mumbai Local Accident : शीव स्थानकाजवळ लोकलमधून ३ प्रवाशांचा तोल गेला अन् थेट रुळांवर फेकले गेले; २ जण गंभीर जखमी तर एक...

मुंबई : मुंबईच्या लोकल प्रवासातील जीवघेणी गर्दी पुन्हा एकदा प्रवाशांच्या मुळावर उठली आहे. शुक्रवारी सकाळी ऐन

राज्यात नवीन रक्तपेढी सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

रक्तपिशव्यांचे संकलन करण्यासाठी हमीपत्राची गरज मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यात नवीन रक्तपेढी सुरू

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहतूक बंद

मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याची कामे

निवडणुका पुढे ढकलल्याने शिक्षक संभ्रमात

परीक्षा आणि निवडणूक ड्युटी एकाच वेळी; शिक्षकांच्या अडचणीत वाढ मुंबई : महाराष्ट्रात १२ जिल्हा परिषद आणि १२५

भाजपच्या नगरसेवकांची सोमवारी कोकण भवनमध्ये नोंदणी

गटाऐवजी भाजप स्वतंत्रपणे नगरसेवकांची करणार नोंदणी मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर

राज्यातील ‘आयटीआय’ होणार ‘स्किल डेव्हलमपेंट हब’

मंत्री मंगलप्रभात लोढा; पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्याचा समावेश मुंबई : पंतप्रधान