Emergency : कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटामागची साडेसाती काही सुटेनाच!

'इमर्जन्सी' पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात


मुंबई : बॉलीवूड क्विन ओळख असलेल्या कंगनाचा नुकताच इमर्जन्सी चित्रपट रिलीज झाला आहे. वादाच्या भोवऱ्यात असलेला इमर्जन्सी खूप प्रयत्नांनी हिरवा सिग्नल मिळाल्यावर रिलीज झाला होता. मात्र रिलीज झाल्यानंतरही त्याची साडेसाती कायम आहे. पुन्हा एकदा 'इमर्जन्सी' चित्रपटावर कॉपी राईट चा दावा करण्यात आला आहे.



कंगना रणौत दिग्दर्शित इमर्जन्सी चित्रपट १७ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात कंगना स्वतः इंदिरा गांधी यांच्या पेहरावात दिसत आहे. 'इमर्जन्सी' प्रदर्शित होण्याआधीच कंगनाला खूप अडथळ्यांना सामोरे जावं लागलं आहे. हा सिनेमा २०२४ मध्ये जून महिन्यात रिलीज होणार होता. पण, तो वादात अडकला होता. परंतु काही सीन्स कट केल्यानंतर सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दिला. मात्र असं असलं तरी आता इमर्जन्सी नव्या वादात अडकला आहे. 'इमर्जन्सी'वर २६ जानेवारी १९५० रोजी लिहिलेल्या राष्ट्रीय कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या 'जनतंत्र का जन्म' या कवितेतील 'सिंघासन खाली करो की जनता आती है' ही ओळ परवानगीशिवाय वापरल्याचा आरोप आहे. ही ओळ नंतर दिनकर यांच्या प्रसिद्ध पुस्तक नील कुसुममध्ये समाविष्ट करण्यात आली. या पुस्तकाचे कॉपीराइट स्वप्ना सिंह यांच्याकडे आहेत. हे गाणं मनोज मुंतशीर यांनी लिहिलंय.


२६ ऑगस्ट २०२४ रोजी, चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, ही ओळ चित्रपटात असल्याचं उघड झालं. अशा परिस्थितीत, ३१ ऑगस्ट २०२४ रोजी चित्रपट निर्मात्याला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. पण निर्मात्यांनी यावर कोणतेही उत्तर दिलं नाही. त्यामुळे आता इमर्जन्सी नव्याने वादात अडकली आहे. दरम्यान चित्रपटाच्या मागची तिढा सुटणार कि वाढणारं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Comments
Add Comment

मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

'एज्युकेट गर्ल्स' संस्थेसोबत शासनाचा सामंजस्य करार मुंबई : राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू

CSR डॅशबोर्ड सुरू करा, मुंबई महापालिकेकडे आमदार साटमांची मागणी

दानशूर संस्था व नागरिकांना योगदान देण्यासाठी प्लॅटफॉर्म उभारण्याचा प्रस्ताव, आमदार अमीत साटम यांचे महापौर

शाहरुख, सलमानला भेटा, ५० रुपयांत वांद्रयात फिरा

सध्या सगळीकडेच महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं की मुंबईत फिरणं म्हणजे आपल्याला काही परवडणार

Mumbai: चेंबूरमधील संतापजनक घटना; एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई: मुंबईत एक संतापजनक घटना समोर आली आहे. चेंबूरच्या टिळक नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या आनंदाची बातमी, १ जूनपासून...

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर