Emergency : कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटामागची साडेसाती काही सुटेनाच!

'इमर्जन्सी' पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात


मुंबई : बॉलीवूड क्विन ओळख असलेल्या कंगनाचा नुकताच इमर्जन्सी चित्रपट रिलीज झाला आहे. वादाच्या भोवऱ्यात असलेला इमर्जन्सी खूप प्रयत्नांनी हिरवा सिग्नल मिळाल्यावर रिलीज झाला होता. मात्र रिलीज झाल्यानंतरही त्याची साडेसाती कायम आहे. पुन्हा एकदा 'इमर्जन्सी' चित्रपटावर कॉपी राईट चा दावा करण्यात आला आहे.



कंगना रणौत दिग्दर्शित इमर्जन्सी चित्रपट १७ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात कंगना स्वतः इंदिरा गांधी यांच्या पेहरावात दिसत आहे. 'इमर्जन्सी' प्रदर्शित होण्याआधीच कंगनाला खूप अडथळ्यांना सामोरे जावं लागलं आहे. हा सिनेमा २०२४ मध्ये जून महिन्यात रिलीज होणार होता. पण, तो वादात अडकला होता. परंतु काही सीन्स कट केल्यानंतर सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दिला. मात्र असं असलं तरी आता इमर्जन्सी नव्या वादात अडकला आहे. 'इमर्जन्सी'वर २६ जानेवारी १९५० रोजी लिहिलेल्या राष्ट्रीय कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या 'जनतंत्र का जन्म' या कवितेतील 'सिंघासन खाली करो की जनता आती है' ही ओळ परवानगीशिवाय वापरल्याचा आरोप आहे. ही ओळ नंतर दिनकर यांच्या प्रसिद्ध पुस्तक नील कुसुममध्ये समाविष्ट करण्यात आली. या पुस्तकाचे कॉपीराइट स्वप्ना सिंह यांच्याकडे आहेत. हे गाणं मनोज मुंतशीर यांनी लिहिलंय.


२६ ऑगस्ट २०२४ रोजी, चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, ही ओळ चित्रपटात असल्याचं उघड झालं. अशा परिस्थितीत, ३१ ऑगस्ट २०२४ रोजी चित्रपट निर्मात्याला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. पण निर्मात्यांनी यावर कोणतेही उत्तर दिलं नाही. त्यामुळे आता इमर्जन्सी नव्याने वादात अडकली आहे. दरम्यान चित्रपटाच्या मागची तिढा सुटणार कि वाढणारं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Comments
Add Comment

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारीपर्यंत लागू करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सूचना मुंबई  : मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारी २०२६

भारतातील अस्वच्छ शहरांमध्ये मुंबईचा समावेश, दिल्लीलाही टाकले मागे

मुंबई: स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ च्या अहवालात स्वच्छतेच्या आधारावर भारतातील शहरांचे क्रमांक जाहीर करण्यात

Chhagan Bhujbal : राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी 'हृदय शस्त्रक्रिया'; प्रकृती स्थिर, काही दिवस सक्तीची विश्रांती

मुंबई : महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर मुंबईतील एशियन

ठाणे ते बोरिवली प्रवास होणार अवघ्या १५ मिनिटांत; दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम वेगात

मुंबई : देशातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा रस्ते मार्ग म्हणजे ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प

वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कामाला वेग; भांडुप जंक्शनवर एका रात्रीत ४५० टन वजनाचा बसवला स्टील स्पॅन

मुंबई : केवळ एका रात्रीत मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अभियंता पथकाने भांडुप ते सोनापूर

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो होणार सहा डब्यांची; प्रवाशांची होणार गर्दीतून सुटका

३२ अतिरिक्त डबे खरेदीसाठी निविदा काढण्याची तयारी सुरू मुंबई : मुंबईकरांचा मेट्रो प्रवास आता लवकरच गर्दीमुक्त