Toll : १ एप्रिलपासून टोल ५ ते १० रुपयांनी महागणार!

देखभाल-दुरुस्तीवरील खर्च वाढल्याचे सांगितले जाते कारण


सोलापूर : सध्या राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणा-या वाहनांसाठी वेगवेगळ्या वर्गवारीनुसार टोल दर (Toll) आकारले जातात. महामार्गांचा विस्तार, वाहनांची वाढती संख्या, आणि देखभाल-दुरुस्तीवरील वाढता खर्च लक्षात घेता, १ एप्रिलपासून टोल टॅक्स ५ ते १० रुपयांनी वाढवला जाऊ शकतो, अशी माहिती वरिष्ठ अधिका-यांनी दिली आहे.



सोलापूर जिल्ह्यातील टोल नाक्यांची स्थिती


सोलापूर जिल्ह्यातून सोलापूर-पुणे, सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-धाराशिव, सोलापूर-विजयपूर, आणि नागपूर-रत्नागिरी असे मुख्य महामार्ग जातात. या मार्गांवर सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत सात टोल नाके आहेत. दररोज या मार्गांवरून सुमारे २ ते २.५ लाख वाहने प्रवास करतात.


महामार्गांचे काम सुधारत असले तरी टोल दर दरवर्षी वाढत असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी आहे. विशेषतः सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील वडवळ ते चंद्रमौळी आणि अनगर पाटी ते शेटफळ या भागांत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवास करणा-या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.



ये-जा टोल नियम आणि नवे दर


सध्याच्या नियमांनुसार, २४ तासांत त्याच मार्गावरून परत प्रवास करणा-या वाहनांना ये-जा टोल रकमेचा अर्धा दर भरावा लागतो. यामध्ये कारसाठी (एकेरी प्रवास) ७५ रुपये, टेम्पोसाठी ११५ रुपये, सहा टायर ट्रकसाठी २४५ रुपये, तर १० किंवा त्यापेक्षा जास्त टायरच्या वाहनांसाठी ३९५ रुपये टोल भरावा लागतो.


सध्या हे दर पुढीलप्रमाणे आहेत:




  • कारसाठी: ₹११०

  • टेम्पोसाठी: ₹१७५-१८०

  • सहा टायर ट्रकसाठी: ₹३७०

  • १० किंवा अधिक टायरच्या वाहनांसाठी: ₹५९०


१ एप्रिलपासून या दरात ५ ते १० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे, असे समजते.


दरम्यान, महामार्गाच्या देखभालीसाठी टोल वाढीचे कारण दिले जात असले तरी, खराब रस्त्यांमुळे वाहनचालकांचा विरोध होत आहे. प्रशासनाने या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.



‘डब्ल्यूपीआय’नुसार वाढतो टोल टॅक्स


दरवर्षी टोल टॅक्समध्ये वाढ केली जाते आणि १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होते. यंदा टोल टॅक्स वाढीसाठी नेहमीप्रमाणे व्होलसेल प्राइस इंडेक्सचा (डब्ल्यूपीआय) आधार घेतला जाईल. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारितील (एनएचएआय) सात टोल नाके आहेत. - राकेश जावडे, प्रकल्प संचालक, एनएचएआय, सोलापूर



‘डब्ल्यूपीआय’च्या आधारे वाढतो टोल


केंद्र सरकारच्या वाहतूक विभागाकडून कोणत्या महामार्गांवरुन किती वाहने दररोज ये-जा करतात, त्या महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी दरवर्षी किती खर्च करावा लागतो, आणखी काय उपाययोजना अपेक्षित आहेत, अशा विविध बाबींचा विचार करून व्होलसेल प्राइस इंडेक्स निश्चित केला जातो. त्यावरुन कोणत्या महामार्गांवर किती टोल टॅक्स वाढवायचा हे निश्चित होते. त्यानुसार १ एप्रिलपासून नवे दर लागू होतात, असेही अधिका-यांनी यावेळी सांगितले.



सोलापूर जिल्ह्यातील टोल नाके



  • इचगाव (ता. मंगळवेढा)

  • पाटकूल, सावळेश्वर (ता. मोहोळ)

  • वरवडे (ता. माढा)

  • नांदणी (ता. अक्कलकोट)

  • वळसंग (ता. दक्षिण सोलापूर)

  • अनकढाळ (ता. सांगोला)

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य