Wardha News : ५१ म्हशींची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला, पाच जण अटकेत

  41

वर्धा : अवैधरित्या वाहतूक करणारे कंटेनरमध्ये जनावरे भरून घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना अटक करून ४७ लाख ७५ हजार रुपंयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. तसेच जनावरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वोदय गोशाळा पडेगाव येथे दाखल करण्यात आले.





४७ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकने समृद्धी महामार्गावर विरुळ परिसरात नाकाबंदी केली. पोलिसांनी एका कंटेनरची तपासणी केली. त्यात म्हैस वर्गीय ५१ जनावरांना अवैधरीत्या वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी १२ लाख ७५ हजार रुपयांची म्हैस वर्गीय ५१ जनावरे, तसेच कंटेनर असा ४७ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.




पुढील तपास सुरू


ही जनावरे अकबर अली जलाउद्दीन रा. ईलीपाकोनथ्थु, जि. त्रिवेंद्रमपुरम (केरळ) (पसार) याच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिस स्टेशन पुलगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागरकुमार कवडे यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, हमीद शेख, सचिन इंगोले, राजेश तिवस्कर, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, अभिषेक नाईक, शिवकुमार परदेशी, अखिलेश इंगळे, रितेश गेटमे यांनी केली.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या