'उद्धव ठाकरे सोयीनुसार हिंदुत्वाचा मुखवटा लावतात'

मुंबई : उद्धव ठाकरे त्यांच्या सोयीनुसार हिंदुत्वाचा मुखवटा लावतात. त्यांचा विकासाशी काहीही संबंध नाही; अशी टीका भाजपाच्या विधान परिषदेतील आमदार चित्रा वाघ यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी २३ जानेवारी रोजी मुंबईत एक सभा घेतली. या सभेत केलेल्या वक्तव्यांचा चित्रा वाघ यांनी समाचार घेतला.



औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना अचानक हिंदुत्व आठवले… ते हवं तेव्हा हिंदुत्वाचा मुखवटा लावतात आणि एरवी तो खुंटीवर टांगून ठेवतात... लांगूलचालन करत उलेमा बोर्डाच्या १७ मागण्या मान्य करताना कुठे गेले होते उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व ? पाकिस्तानी झेंडे डोळ्यासमोर नाचवले गेले तेव्हा कुठे गेले होते उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व ? व्होट जिहाद करताना ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर मशीद उभारण्यापर्यंत घोषणा करताना कुठे गेले होते उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व ? वक्फ बोर्डाच्या मुद्यावर बोलणे टाळायचे आणि जनतेने विरोधात कौल दिला की तो अमान्य करायचा ही उद्धव ठाकरेंची जुनीच खोड आहे. आता उद्धव ठाकरेंना सूड घ्यायचा आहे... कोणाचा ? जनतेचा ? वारंवार गद्दार - खंजीर सारखी भाषणं करणं आणि रोज सकाळी माध्यमांवर तुमच्या भोंग्याला सोडणं हा जनतेवर उगवला जाणारा सूडच आहे. बाकी विकास आणि प्रत्यक्ष काम याचा आणि उद्धव ठाकरेंचा काहीही संबध नाही हे जनता देखील जाणते; या शब्दात आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.



याआधी मंत्री आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरेंच्या सभेतील भाषणाचा समाचार घेतला. उबाठाच्या मेंदूतच झोल आहे, असे आशिष शेलार म्हणाले. उद्धव ठाकरेंचा जन्म २७ जुलै १९६० रोजी झाला आणि जनसंघाची स्थापना १९५१ मध्ये झाली. नंतर दिल्लीत जनसंघाच्या नेत्यांची बैठक झाली आणि नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाला. ही बैठक पाच आणि सहा एप्रिल १९६० रोजी झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे जेमतेम वीस वर्षांचे होते. फोटोग्राफी करण्यात दंग असलेल्या उद्धव ठाकरेंनी जनसंघ, भाजपा आणि १०० वर्षे पूर्ण करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी बोलण्याला काही अर्थ आहे का ?... पंतप्रधान मोदींनी जगात भारताचा बहुमान वाढवला तर अमित शाह यांनी भाजपाला जगातील सर्वात मोठा आणि सक्षम पक्ष केले. यामुळे उद्धव ठाकरेंनी मोदी आणि अमित शाह याविषयावर बोलण्यालाही अर्थ नाही.



महापालिकेत उद्धव ठाकरेंची सत्ता होती त्यावेळी मुंबईत महापूर आला. मुंबई २६ जुलैच्या महापुरात बुडली होती आणि बाळासाहेब ठाकरे अडचणीत सापडले होते त्यावेळी उद्धव ठाकरे मिठी नदीच्या पुराला पाठ दाखवून पंचतारांकीत हॉटेलमध्ये पळून गेले. कंत्राटदारांकडून कमिशन खाऊन त्यांनी मुंबईचा बट्ट्याबोळ केला आहे; या शब्दात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
Comments
Add Comment

WhatsApp Username Feature : मोबाईल नंबरशिवाय व्हॉट्सॲप वापरण्याच्या फीचरला सरकारचा विरोध; जाणून घ्या कारण

मुंबई : जगभरात ३ अब्जांहून अधिक वापरकर्ते (Users) असलेल्या व्हॉट्सॲपच्या (WhatsApp) नव्या 'युझरनेम' (Username) फीचरला (Feature) भारतात

Chembur Tree Collapse : झाड दुघर्टनाप्रकरणी संबंधित निष्काळजीपणा करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांचे निलंबन

संबंधित कंत्राटदारावरही महानगरपालिका करणार कठोर कारवाई मुंबई : चेंबूर पश्चिम परिसरातील डायमंड गार्डनजवळ

Mumbai Rain : मुंबईला मुसळधार पावसाचा तडाखा! २४ तासांत शहरात १७२ मिमी पावसाची नोंद; रात्री अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने (Mumbai Rain) जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये

Mumbai Rain Red Alert : मुंबईत मुसळधार पाऊस सुरूच; ठाण्यात रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये २ जुलै रोजीही मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र

Kurla Landslide: कुर्ला पश्चिम बुद्ध कॉलनीसमोर दरड कोसळली, तीन कुटुंबांना पर्यायी जागेत हलवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कुर्ला पश्चिम येथील बुद्ध कॉलनीसमोरील दरडीच (Kurla Landslide) काही भाग कोसळण्याची घटना मंगळवारी

Powai Lake : पवई तलाव भरला, पण मुंबईकरांना नाही काही फायदा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील (Mumbai) कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव