अभिनेत्री ममता कुलकर्णीने घेतला संन्यास

प्रयागराज : महाकुंभमेळ्यातून एक मोठी बातमी आली आहे. बॉलिवूडमध्ये ९० चे दशक गाजवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने धार्मिक विधी करुन संन्यास घेतला. आता ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर श्री यमाई ममता नंदगिरी झाली आहे. किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण यांनी ही माहिती दिली.



स्वतःचे पिंडदान केल्यानंतर ममता कुलकर्णीने संन्यास घेतला. ममताचा पट्टाभिषेक झाला. यानंतर ममताला धार्मिक विधी करुन महामंडलेश्वर केल्याचे जाहीर करण्यात आले. ममताला किन्नर आखड्याची सदस्य म्हणून नवे नाव देण्यात आले आहे. हेच नाव आता ममताची ओळख असेल. ती साध्वी प्रमाणे जीवन जगणार आहे.



अभिनय क्षेत्रात नशीब आजमावल्यानंतर ममता मागील २४ - २५ वर्षांपासून परदेशात वास्तव्यास होती. ममतावर अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी असल्याचा आरोप झाला. पण हा आरोप सिद्ध झाला नाही. आता प्रदीर्घ काळानंतर मायदेशी परतलेली ममता संन्यास घेऊन एका नव्या आयुष्याला सुरुवात करत आहे.

मागील वर्ष - दीड वर्षापासून ममता कुलकर्णी किन्नर आखाडा आणि महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण यांच्या संपर्कात होती. प्रदीर्घ चर्चेअंती ममताने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.