Bollywood Death Threats : बॉलिवूडवर संकटाचे सावट! चार दिग्गज कलाकारांना दिली जीवे मारण्याची धमकी

मुंबई : काही महिन्यांपासून अभिनेता सलमान खानला (Salman Khan) सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यानंतर नुकतेच सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अशातच आता बॉलीवूडमधले चार दिग्गज कलाकारांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर संकट आल्याचे दिसून येत आहे.



कॉमेडियन कपिल शर्माला (Kapil Sharma), अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav), कोरिओग्राफर रेमो डिसुझा (Remo Dsouza) आणि सुगंधा मिश्रा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. कपिलसह त्याच्या कुटुंबालाही मारण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



धमकीचा पाकिस्तानशी कनेक्शन


कपिल शर्मा, राजपाल यादव, रेमो डिसूझा आणि सुंगधा मिश्रा या कलाकारांना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा ई-मेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आला असल्याचा अंदाज दिला जात आहे. यामध्ये 'BISHNU' असे लिहिण्यात आले आहे. तसेच ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीला जर ८ तासात प्रतिसाद मिळाला नाही तर, कारवाई करणार असे लिहले आहे. (Bollywood Death Threats)

Comments
Add Comment

रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा तिमाही निकाल जाहीर कंपनीच्या नफ्यात १.७% वाढ तरीही फंडामेंटल मजबूत

मोहित सोमण: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या देशातील सर्वात मोठ्या कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे.

महाराष्ट्र भाजपचा! २९ पैकी २५ महापालिकांवर भाजप महायुतीचा झेंडा

मतदारांचा विकासाला कौल; ठाकरे बंधूंसह पवार काका-पुतण्याला दणका मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील २९ महापालिकांच्या

मुंबई महापालिका निवडणूक निकालात काय घडले?

नार्वेकरांनी तिन्ही गड राखले मुंबई : कुलाबा विधानसभेत भाजपच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर

उबाठा पहिल्यांदा बसणार मुंबईत विरोधी पक्षात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मागील २५

राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार,

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई (प्रतिनिधी) : ज्या काँग्रेसपायी उबाठा गटाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत