Nitesh Rane : मुंब्राचे जीतुद्दीन आणि बारामतीच्या ताईंना फक्त खान कलाकारांची काळजी!

सैफवरील हल्ल्यावर मंत्री नितेश राणे यांचे वक्त्व्य


मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) मागच्या आठवड्यात चाकू हल्ला झाला. त्यामध्ये सैफ गंभीररित्या जखमी झाला होता. वांद्रयाच्या लिलावती रुग्णालयात त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. सैफचा फिटनेस पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले असताना या हल्ल्याबाबत संशय व्यक्त होत आहे. अशातच मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील याबाबत वक्तव्य केलं आहे.



'जेव्हा कोणत्याही खानला दुखापत होते तेव्हा सर्वजण त्याबद्दल बोलू लागतात. मात्र सुशांत सिंग राजपूत सारख्या हिंदू अभिनेत्यावर अत्याचार होतात तेव्हा कोणीही काहीही बोलण्यासाठी पुढे येत नाही'. मुंब्राचे जीतुद्दीन (जितेंद्र आव्हाड) आणि बारामतीची ताई (सुप्रिया सुळे) यांना कधी हिंदू कलाकाराची काळजी करताना पाहिले नाही. मात्र कोणत्याही खानला सुखापत झाली तर त्यांना काळजी वाटते, असा घणाघात मंत्री नितेश राणे यांनी केला.


त्याचबरोबर सैफला बघितल्यावर त्याला खरच चाकू मारला की अॅक्टिंग करतोय असा संशय येत आहे. “बांग्लादेशी सैफ अली खानच्या घरात घुसले. नालायकपणा किती आहे. आधी फक्त नाक्यावर उभे रहायचे. आता घरात घुसायला लागले आहेत. कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील. सैफ बाहेरुन असा चालत होता की, मलाच संशय आला याला खरच कोणी चाकू मारला की हा अॅक्टिंग करुन बाहेर पडला. असं टुणटुण करुन” असा टोला देखील नितेश राणे यांनी लगावला.

Comments
Add Comment

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका; आजच्या बैठकीत काय घडलं ?

(Marathi Language Compulsory Taxi-Auto ) : आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य