Valentine Day Special : हवामानामुळे फुलांचा राजा 'व्हॅलेंटाईन डे' ला हिरमुसणार!

  60

पुणे : फेब्रुवारी महिना प्रेमवीरांसाठी खास मानला जातो. याच फेब्रुवारी महिन्यात 'व्हॅलेंटाईन डे'ला प्रेमवीरांच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे . या 'व्हॅलेंटाईन डे' ला गिफ्ट सोबत प्रियकर प्रेयसीला गुलाब देतात. या गुलाबाच्या पाकळ्या प्रेमाचं प्रतीक मानलं जात. या दिवसात गुलाबांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. मात्र या वर्षी फुलांचा राजा प्रेमवीरांना नाराज करणार असल्याचे चित्र दिसते आहे. हवामानाच्या बदलत्या स्वरूपामुळे गुलाबाच्या फुलांच्या पिकावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात येणारी गुलाबाची फुल मुबलक प्रमाणावर दिसतील अशी माहिती समोर आली आहे.



फेब्रुवारी महिन्यात गुलाबाची फुलं जास्त प्रमाणात दिसतात. या दिवसात गुलाबाच्या फुलांना शेतकऱ्यांना समाधानकारक वाटणारा बहर येतो. मावळमध्ये हवामानाच्या लपंडावामुळे गुलाबावर परिणाम होत आहे. त्यामुळे गुलाब शेतीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी फुल उत्पादक योग्य ती काळजी घेतं आहेत. त्यासाठी औषध फवारणी सह इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आता खर्च वाढला आहे. तर दुसरीकडे थंडी अभावी फुलांचे उत्पादन लवकर येण्याची शक्यता असल्याने व्हॅलेंटाईन डे साठीच्या उत्पादनाचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता फुल उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येणार 'व्हॅलेंटाईन डे' शेतकऱ्यांसाठी कोणतं आव्हान घेऊन येतो हे बघणं महत्त्वाचं ठरेल.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या