Valentine Day Special : हवामानामुळे फुलांचा राजा 'व्हॅलेंटाईन डे' ला हिरमुसणार!

पुणे : फेब्रुवारी महिना प्रेमवीरांसाठी खास मानला जातो. याच फेब्रुवारी महिन्यात 'व्हॅलेंटाईन डे'ला प्रेमवीरांच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे . या 'व्हॅलेंटाईन डे' ला गिफ्ट सोबत प्रियकर प्रेयसीला गुलाब देतात. या गुलाबाच्या पाकळ्या प्रेमाचं प्रतीक मानलं जात. या दिवसात गुलाबांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. मात्र या वर्षी फुलांचा राजा प्रेमवीरांना नाराज करणार असल्याचे चित्र दिसते आहे. हवामानाच्या बदलत्या स्वरूपामुळे गुलाबाच्या फुलांच्या पिकावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात येणारी गुलाबाची फुल मुबलक प्रमाणावर दिसतील अशी माहिती समोर आली आहे.



फेब्रुवारी महिन्यात गुलाबाची फुलं जास्त प्रमाणात दिसतात. या दिवसात गुलाबाच्या फुलांना शेतकऱ्यांना समाधानकारक वाटणारा बहर येतो. मावळमध्ये हवामानाच्या लपंडावामुळे गुलाबावर परिणाम होत आहे. त्यामुळे गुलाब शेतीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी फुल उत्पादक योग्य ती काळजी घेतं आहेत. त्यासाठी औषध फवारणी सह इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आता खर्च वाढला आहे. तर दुसरीकडे थंडी अभावी फुलांचे उत्पादन लवकर येण्याची शक्यता असल्याने व्हॅलेंटाईन डे साठीच्या उत्पादनाचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता फुल उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येणार 'व्हॅलेंटाईन डे' शेतकऱ्यांसाठी कोणतं आव्हान घेऊन येतो हे बघणं महत्त्वाचं ठरेल.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये