Mumbai Nashik Highway : मुंबई नाशिक महामार्गावर रासायनिक कंटेनर उलटला!

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील कॅडबरी जंक्शन भागात बुधवारी दुपारी रासायनिक कंटेनर उलटल्याने अपघात झाला. या अपघातामुळे कॅडबरी जंक्शन भागात काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले. उरण जेएनपीटी येथून गुजरात आणि भिवंडीच्या दिशेने हजारो अवजड वाहनांची वाहतुक होते. ही वाहने घोडबंदर, भिवंडी येथील काल्हेर भागात जाण्यासाठी कॅडबरी जंक्शन येथील सिग्नल जवळील उड्डाणपुलाखालून वळण घेतात.




बुधवारी १७ टन वजनाच्या रासायनिक पदार्थांनी भरलेला कंटेनर गुजरात येथील दहेज या भागात वाहतुक करणार होते. कंटेनरमध्ये चालक भुपेंद्र कुमार आणि मदतनीस नीरज कुमार हे बसले होते. दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास कंटेनर कॅडबरी जंक्शन येथे आले असता, चालक भुपेंद्र याचे वाहनावरील निंयत्रण सुटले आणि कंटेनर उलटला. या अपघातामुळे कंटेनरमधील रासायनिक पदार्थ आणि तेल रस्त्यावर सांडले. घटनेची माहिती ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, घनकचरा विभाग आणि पोलिसांना मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी रस्त्यावर सांडलेल्या तेल आणि रासायनिक पदार्थांवर माती पसरविली. या अपघातामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील कॅडबरी जंक्शन परिसरात वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे घोडबंदर, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले.


Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.