Mumbai Nashik Highway : मुंबई नाशिक महामार्गावर रासायनिक कंटेनर उलटला!

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील कॅडबरी जंक्शन भागात बुधवारी दुपारी रासायनिक कंटेनर उलटल्याने अपघात झाला. या अपघातामुळे कॅडबरी जंक्शन भागात काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले. उरण जेएनपीटी येथून गुजरात आणि भिवंडीच्या दिशेने हजारो अवजड वाहनांची वाहतुक होते. ही वाहने घोडबंदर, भिवंडी येथील काल्हेर भागात जाण्यासाठी कॅडबरी जंक्शन येथील सिग्नल जवळील उड्डाणपुलाखालून वळण घेतात.




बुधवारी १७ टन वजनाच्या रासायनिक पदार्थांनी भरलेला कंटेनर गुजरात येथील दहेज या भागात वाहतुक करणार होते. कंटेनरमध्ये चालक भुपेंद्र कुमार आणि मदतनीस नीरज कुमार हे बसले होते. दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास कंटेनर कॅडबरी जंक्शन येथे आले असता, चालक भुपेंद्र याचे वाहनावरील निंयत्रण सुटले आणि कंटेनर उलटला. या अपघातामुळे कंटेनरमधील रासायनिक पदार्थ आणि तेल रस्त्यावर सांडले. घटनेची माहिती ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, घनकचरा विभाग आणि पोलिसांना मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी रस्त्यावर सांडलेल्या तेल आणि रासायनिक पदार्थांवर माती पसरविली. या अपघातामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील कॅडबरी जंक्शन परिसरात वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे घोडबंदर, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले.


Comments
Add Comment

चाहत्यांची प्रतीक्षा संपली, लवकरच रितेशचा 'हा' आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार

अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी सिनेमाची चाहते अनेक दिवसांपासून वाटत पाहत आहेत. मात्र, आता त्यांच्यासाठी खुशबर

बादशाहनंतर आता 'या' प्रसिद्ध गायकाला जीवे मारण्याची धमकी

नुकताच काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक बादशाहला बिष्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु