गोराई आगारातील बसने तरुणाला चिरडले

मुंबई : कुर्ला येथील अपघातानंतर चर्चांच्या फैरी झडल्या असल्या तरी बेस्टच्या बसेसचे अपघात आटोक्यात आलेले नाहीत. बेस्टच्या भाडेतत्वावरील गाड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. गोराई आगाराच्या परिसरात मंगळवारी अशाच एका अपघातात एका तरुणाचा जीव गेला. गोराई परिसरात बेस्टच्या बसचा या महिन्यातील हा तिसरा अपघात आहे.


बेस्टच्या भाडेतत्वावरील गाडीला कुर्ला येथे झालेल्या भीषण अपघातानंतर बेस्टच्या अपघातांच्या अनेक घटना बाहेर येऊ लागल्या आहेत. गोराई परिसरातही बेस्टच्या भाडेतत्वावरील बसने अपघात केल्याच्या तीन घटना या महिन्यात घडल्या आहेत. त्यातच मंगळवारी २१ जानेवारी रोजी झालेल्या अपघातात एका तरुणाने जीव गमावल्यामुळे या अपघातांचे गांभीर्य वाढले आहे. मंगळवारी झालेल्या अपघातात बसच्या चाकाखाली आल्यामुळे याच परिसरात राहणाऱ्या वैभव कांबळे याचा मृत्यू ओढवला.



गोराई बसआगाराच्या लगत आकाशवाणी जवळ एल टी मार्ग येथे मंगळवारी सायंकाळी हा अपघात घडला. यावेळी दुचाकीला बेस्टच्या बसगाडीची धडक लागल्यामुळे अपघात झाला आणि दुचाकीस्वार बसच्या मागील चाकात येऊन त्याचा अपघात झाला. वैभव हा याच परिसरातील नंदनवन इमारतीत राहत होता. एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे त्यांच्या कुटंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता