Jalgaon Train Accident : जळगावात रेल्वे दुर्घटना, १५ प्रवाशांचा मृत्यू

पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी मारल्या उड्या; समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसने चिरडल्याने १५ जणांचा मृत्यू

जळगाव : मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये (Pushpak Express) आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. मात्र, समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसने (Bengaluru Express) त्यांना चिरडल्याने सहा ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना (Jalgaon Train Accident) जळगाव जिल्ह्यातील परांडा स्थानकाजवळ घडली आहे.


पुष्पक एक्स्प्रेस मुंबईकडे जात असताना अचानक ब्रेक लावल्यामुळे गाडीच्या चाकांमधून धूर आणि ठिणग्या उडाल्या. या दृश्यामुळे काही प्रवाशांना आग लागल्याची शंका वाटली. घाबरून त्यांनी गाडीतून उड्या मारण्यास सुरुवात केली.



याच वेळी समोरून वेगाने येत असलेल्या बंगळुरू एक्स्प्रेसने या प्रवाशांना धडक दिली. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.



घटनेचे प्रत्यक्षदर्शी बाबा जाधव यांनी सांगितले की, "परांडा स्थानकाच्या अगोदर पुष्पक एक्स्प्रेसचा ब्रेक लागल्याने घर्षण झाले आणि आगीच्या ठिणग्या उडाल्या. यामुळे गाडीत असलेल्या प्रवाशांमध्ये भीती पसरली. काहींनी घाबरुन गाडीतून उड्या मारल्या आणि दुर्दैवाने बंगळुरू एक्स्प्रेसने त्यांना चिरडले."


घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घटनेची माहिती मिळताच दुःख व्यक्त केले.


ब्रेक लावल्यानंतर धूर आणि ठिणग्या


पुष्पक एक्स्प्रेसच्या चाकांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे आग लागल्याचा संशय काही प्रवाशांना झाला. घाबरलेल्या प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्याने आणि त्याचवेळी समोरून आलेल्या गाडीची धडक बसल्याने हा अपघात घडला. बंगळुरू एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना जोरदार धडक बसली, यात प्रवाशांचा मृत्यू झाला.


रेल्वे अधिकाऱ्यांनी या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच, या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.


ही दुर्घटना प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उभे करत असून रेल्वे प्रशासनाने तत्काळ पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)