Jalgaon Train Accident : जळगावात रेल्वे दुर्घटना, १५ प्रवाशांचा मृत्यू

पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी मारल्या उड्या; समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसने चिरडल्याने १५ जणांचा मृत्यू

जळगाव : मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये (Pushpak Express) आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. मात्र, समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसने (Bengaluru Express) त्यांना चिरडल्याने सहा ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना (Jalgaon Train Accident) जळगाव जिल्ह्यातील परांडा स्थानकाजवळ घडली आहे.


पुष्पक एक्स्प्रेस मुंबईकडे जात असताना अचानक ब्रेक लावल्यामुळे गाडीच्या चाकांमधून धूर आणि ठिणग्या उडाल्या. या दृश्यामुळे काही प्रवाशांना आग लागल्याची शंका वाटली. घाबरून त्यांनी गाडीतून उड्या मारण्यास सुरुवात केली.



याच वेळी समोरून वेगाने येत असलेल्या बंगळुरू एक्स्प्रेसने या प्रवाशांना धडक दिली. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.



घटनेचे प्रत्यक्षदर्शी बाबा जाधव यांनी सांगितले की, "परांडा स्थानकाच्या अगोदर पुष्पक एक्स्प्रेसचा ब्रेक लागल्याने घर्षण झाले आणि आगीच्या ठिणग्या उडाल्या. यामुळे गाडीत असलेल्या प्रवाशांमध्ये भीती पसरली. काहींनी घाबरुन गाडीतून उड्या मारल्या आणि दुर्दैवाने बंगळुरू एक्स्प्रेसने त्यांना चिरडले."


घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घटनेची माहिती मिळताच दुःख व्यक्त केले.


ब्रेक लावल्यानंतर धूर आणि ठिणग्या


पुष्पक एक्स्प्रेसच्या चाकांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे आग लागल्याचा संशय काही प्रवाशांना झाला. घाबरलेल्या प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्याने आणि त्याचवेळी समोरून आलेल्या गाडीची धडक बसल्याने हा अपघात घडला. बंगळुरू एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना जोरदार धडक बसली, यात प्रवाशांचा मृत्यू झाला.


रेल्वे अधिकाऱ्यांनी या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच, या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.


ही दुर्घटना प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उभे करत असून रेल्वे प्रशासनाने तत्काळ पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका; आजच्या बैठकीत काय घडलं ?

(Marathi Language Compulsory Taxi-Auto ) : आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य