Good news for BSNL users : 'बीएसएनएल' वापरकर्त्यांना सगळीकडे मिळणार रेंज!

  102

मुंबई : मोबाईल वापरकर्त्यांचा कनेक्टिव्हिटी अनुभव सुधारण्यासाठी दूरसंचार विभागाने एक नवीन फिचर सुरू केले आहे. ज्यामुळे जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल वापरकर्तांना नेटवर्कशिवाय कॉल करणे शक्य होणार आहे. देशातील सर्व टेलिकॉम टॉवर्समध्ये सुरू करण्यात आलेल्या इंट्रा सर्कल रोमिंग सेवेच्या मदतीने हे शक्य होईल. तसेच ही सेवा सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे.




वापरकर्ते फक्त त्यांच्या विशिष्ट टेलिकॉम ऑपरेटरद्वारे चालवल्या जाणाऱ्या टॉवर्सच्या मदतीने ही सेवा मिळवू शकत होते, पण आता ICR सुविधेसह, जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल ग्राहक अखंड कनेक्टिव्हिटीसाठी DBN-निधीत टॉवर्स वापरू शकतात.



खर्चात होणार बचत


दूरसंचार विभागाच्या आकडेवारीनुसार, ही योजना भारतातील ३५,४०० हून अधिक गावांमध्ये २७,००० DBN-निधीत टॉवर्सद्वारे 4G कव्हरेज देईल. तसेच ही सेवा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुरू केली आहे. यासोबतच, संचार साथी मोबाईल अ‍ॅप आणि राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन २.० देखील लाँच करण्यात आले आहे. या सुविधेमुळे, दूरसंचार कंपन्यांना प्रत्येक भागात त्यांचे टॉवर बसवण्याची आवश्यकता राहणार नाही. या उपक्रमामुळे टीएसपींना ऑपरेशनल खर्चात बचत होणार असून त्यांच्या ग्राहकांना सिग्नलच्या कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.



ग्रामीण कनेक्टिव्हीटी सुधारणा


ICR सुविधेबाबत बोलताना सिंधिया यांनी वापरकर्त्यांना चांगली सेवा देण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण आणि दुर्गम भागात सेवा देण्यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, बीएसएनएल, एअरटेल आणि जिओ या तीन प्रमुख दूरसंचार कंपन्यांमधील हे सहकार्य डीबीएन-निधी असलेल्या साइट्सचा फायदा घेत आहे. दूरसंचार कायदा २०२३ अंतर्गत स्थापन झालेला DBN हा भारत सरकारने कमी सेवा असलेल्या क्षेत्रांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी तयार केलेला निधी आहे.

Comments
Add Comment

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.