Good news for BSNL users : 'बीएसएनएल' वापरकर्त्यांना सगळीकडे मिळणार रेंज!

मुंबई : मोबाईल वापरकर्त्यांचा कनेक्टिव्हिटी अनुभव सुधारण्यासाठी दूरसंचार विभागाने एक नवीन फिचर सुरू केले आहे. ज्यामुळे जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल वापरकर्तांना नेटवर्कशिवाय कॉल करणे शक्य होणार आहे. देशातील सर्व टेलिकॉम टॉवर्समध्ये सुरू करण्यात आलेल्या इंट्रा सर्कल रोमिंग सेवेच्या मदतीने हे शक्य होईल. तसेच ही सेवा सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे.




वापरकर्ते फक्त त्यांच्या विशिष्ट टेलिकॉम ऑपरेटरद्वारे चालवल्या जाणाऱ्या टॉवर्सच्या मदतीने ही सेवा मिळवू शकत होते, पण आता ICR सुविधेसह, जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल ग्राहक अखंड कनेक्टिव्हिटीसाठी DBN-निधीत टॉवर्स वापरू शकतात.



खर्चात होणार बचत


दूरसंचार विभागाच्या आकडेवारीनुसार, ही योजना भारतातील ३५,४०० हून अधिक गावांमध्ये २७,००० DBN-निधीत टॉवर्सद्वारे 4G कव्हरेज देईल. तसेच ही सेवा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुरू केली आहे. यासोबतच, संचार साथी मोबाईल अ‍ॅप आणि राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन २.० देखील लाँच करण्यात आले आहे. या सुविधेमुळे, दूरसंचार कंपन्यांना प्रत्येक भागात त्यांचे टॉवर बसवण्याची आवश्यकता राहणार नाही. या उपक्रमामुळे टीएसपींना ऑपरेशनल खर्चात बचत होणार असून त्यांच्या ग्राहकांना सिग्नलच्या कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.



ग्रामीण कनेक्टिव्हीटी सुधारणा


ICR सुविधेबाबत बोलताना सिंधिया यांनी वापरकर्त्यांना चांगली सेवा देण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण आणि दुर्गम भागात सेवा देण्यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, बीएसएनएल, एअरटेल आणि जिओ या तीन प्रमुख दूरसंचार कंपन्यांमधील हे सहकार्य डीबीएन-निधी असलेल्या साइट्सचा फायदा घेत आहे. दूरसंचार कायदा २०२३ अंतर्गत स्थापन झालेला DBN हा भारत सरकारने कमी सेवा असलेल्या क्षेत्रांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी तयार केलेला निधी आहे.

Comments
Add Comment

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या