Water Scheme : पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी संकट?

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस मोठी भर पडत आहे. वाढत्या शहराची तहान भागविण्यासाठी पाण्याचे नवनवे स्त्रोत शोधण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे. तसेच राखीव पाणी साठ्याबाबत वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे न झाल्यास शहरावर पाणी संकट ओढविण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



नवीन स्त्रोताचा शोध घेण्याची वेळ


पिंपरी-चिंचवड शहरात राहण्यास मोठी पसंती दिली जात आहे. तसेच लोकसंख्येचा वेग पाहता शहराची लोकसंख्या दहा वर्षात दुप्पट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र काही भागांत पुरेसे पाणी मिळत नसल्याची तसेच, काही हाउसिंग सोसायट्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. बोअरींग तसेच, खासगी टँकरच्या पाण्यावर अनेक हाऊसिंग सोसायट्यांना आपली गरज भागवत आहेत. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर, रावेत, किवळे, मामुर्डी, पुनावळे, चर्‍होली, थेरगाव, चिंचवड, मोशी, वाकड, पिंपळे गुरव तसेच, एमआयडीसी भागात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. लोकवस्ती वाढत असल्याने पाण्याची मागणी वाढत आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी महापालिका प्रशासनाला पाण्याचे नवीन स्त्रोताचा शोध घेण्याची वेळ आली आहे.



पाण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा


काही गावे महापालिकेत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. त्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यासाठी आताच नियोजन करणे आवश्यक झाले. त्यानुसार राज्य सरकारकडे आम्ही वेळोवेळी प्रस्ताव दिले आहेत. त्यावर पालिकेकडून पाठपुरावा केला जात आहे. सध्या सुरू असलेली भामा आसखेड पाणी योजनेचे कामे मुदतीत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. काही महिन्यात आंद्रा पाणी योजनेचे काम सुरू केले जाईल, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Minister Nitesh Rane : मत्स्यव्यवसाय विभागाने आर्थिक काटकसर करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : मत्स्यव्यवसाय विभागाच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि आर्थिक शिस्त यांना सर्वोच्च प्राधान्य

Police misguidance : दारूचा नाद लई बेक्कार ! थेट पोलिसांना कॉल केला अन...

अकोला : दारूच्या नशेत वाघापूर येथील एका तरुणाने चक्क पोलिसांना फोन केला आणि खोटी माहिती दिल्याचा प्रकार समोर आला

Nitesh Rane : ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून मोती तलावाचे पुनरुज्जीवन करणार - पालकमंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे वैभव असलेल्या प्रसिद्ध मोती तलावाचे मूळ ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा

Mahayuti : विधान परिषदेच्या पुण्याच्या जागेसाठी महायुतीतच चुरस

जिल्ह्यात महायुतीचे ७३४ सदस्य आहेत. मात्र, आपल्या या पारंपरिक हक्काच्या जागेवर दावा सांगणारा अजित पवार गट आणि

Pune Porsche Car Accident Case : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात नवा वाद! जामिनावर सुटल्यानंतर अग्रवाल कुटुंबाची जंगी पार्टी, VIDEO व्हायरल

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली होती.

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे आता सिनेमातून उलगडणार, लवकरच भोंदू खरातचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

Ashok Kharat : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण नाशिकमध्ये समोर आले आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. खरात प्रकरणाने