कोंबडीची शिकार करताना बिबट्या खुराड्यात अडकला

राजापूर : कोंबडीची शिकार करताना बिबट्या खुराड्यात अडकला. अखेर वन विभागाच्या पथकाने खुराड्यातून बाहेर काढून बिबट्याला जीवदान दिले. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार करक तांबळवाडी येथील आत्माराम कांबळे यांच्या खुराड्यामध्ये एक ते दीड वर्षाची मादी बिबट्या अडकला होता. या बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात अर्थात घनदाट जंगलात सोडून देण्यात आले.



कोंबडीची शिकार करण्याच्या उद्देशाने आलेला बिबट्या लोखंडी खुराड्यात शिरला आणि अडकला. बिबट्या खुराड्यात अडकल्याचे बघून आत्माराम कांबळे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी वन विभागाला कळवले. यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन बिबट्याला खुराड्यातून बाहेर काढले आणि नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले. यासाठी बिबट्या अडकलेल्या लोखंडी तारेच्या खुरड्याला ग्रीन शेड नेट गुंडाळून घेऊन पिंजरा लावण्यात आला. यानंतर लांबून खुराड्याच्या तारा कापून बिबट्याला पिंजऱ्यात घेण्यात आले. नंतर बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नंतर बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले.



बिबट्याच्या सुटकेची कारवाई वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण प्रियांक लगड,वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यासाठी रत्नागिरी वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार , वनपाल राजापूर जयराम बावदाणे , वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, वनरक्षक जालने आणि रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, दीपक म्हादये, नितेश गुरव, अमित बाणे , निलेश म्हादये आदींसह स्थानिक ग्रामस्थांनी संयुक्तपणे केली.

वन्यजीव नागरी वस्तीत किंवा आसपास आढळले तर वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ येथे संपर्क साधावा असे आवाहन वन विभागाच्या वतीने वनअधिकारी गिरिजा देसाई यांनी केले.
Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण