कोंबडीची शिकार करताना बिबट्या खुराड्यात अडकला

  74

राजापूर : कोंबडीची शिकार करताना बिबट्या खुराड्यात अडकला. अखेर वन विभागाच्या पथकाने खुराड्यातून बाहेर काढून बिबट्याला जीवदान दिले. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार करक तांबळवाडी येथील आत्माराम कांबळे यांच्या खुराड्यामध्ये एक ते दीड वर्षाची मादी बिबट्या अडकला होता. या बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात अर्थात घनदाट जंगलात सोडून देण्यात आले.



कोंबडीची शिकार करण्याच्या उद्देशाने आलेला बिबट्या लोखंडी खुराड्यात शिरला आणि अडकला. बिबट्या खुराड्यात अडकल्याचे बघून आत्माराम कांबळे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी वन विभागाला कळवले. यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन बिबट्याला खुराड्यातून बाहेर काढले आणि नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले. यासाठी बिबट्या अडकलेल्या लोखंडी तारेच्या खुरड्याला ग्रीन शेड नेट गुंडाळून घेऊन पिंजरा लावण्यात आला. यानंतर लांबून खुराड्याच्या तारा कापून बिबट्याला पिंजऱ्यात घेण्यात आले. नंतर बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नंतर बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले.



बिबट्याच्या सुटकेची कारवाई वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण प्रियांक लगड,वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यासाठी रत्नागिरी वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार , वनपाल राजापूर जयराम बावदाणे , वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, वनरक्षक जालने आणि रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, दीपक म्हादये, नितेश गुरव, अमित बाणे , निलेश म्हादये आदींसह स्थानिक ग्रामस्थांनी संयुक्तपणे केली.

वन्यजीव नागरी वस्तीत किंवा आसपास आढळले तर वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ येथे संपर्क साधावा असे आवाहन वन विभागाच्या वतीने वनअधिकारी गिरिजा देसाई यांनी केले.
Comments
Add Comment

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

खेड जवळील मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला भीषण आग, प्रवासी थोडक्यात बचावले

खेड मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ रविवारी (दि. २४) पहाटे २.१० वाजता लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना