Raigad News : रायगडमधील २६ प्राथमिक शाळांना ठोकले टाळे! नेमकं कारण काय?

अलिबाग : खासगी शाळांकडे पालकांचा वाढता कल पहाता पटसंख्येअभावी रायगड जिल्ह्यातील (Raigad News) २६ शाळा बंद (Primary School) झाल्या आहेत. या शाळांमधील अन्य विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन केले जाणार आहे. सातत्याने घटणारी पटसंख्या ही चिंतेची बाब असून, खासगी शाळांकडे पालकांचा वाढता कल हे यामागचे प्रमुख कारण ठरले आहे. मोफत शिक्षण, मोफत पुस्तके, मोफत गणवेश, मोफत मध्यान्ह भोजन यासारख्या सोयीसुविधा देऊनही रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यात शिक्षण विभागाला अपयश येत आहे. जिल्हा परिषदेच्या दोन हजार ५२८ शाळा कार्यरत होत्या. यांपैकी २६ शाळा पटसंख्याअभावी बंद झाल्या आहेत. त्यामुळे आता सुरू असलेल्या शाळांची संख्या घटून दोन हजार ५०२ वर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या पाच वर्षात शंभरहून अधिक शाळा बंद झाल्या आहेत.



जिल्ह्यात पहिली ते आठवी शाळेत ८७ हजार १४५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांचा कल लक्षात घेतल्यास २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्या अजून घटण्याची शक्यता आहे. बंद पडलेल्या २६ शाळांमध्ये अलिबाग तालुक्यातील दोन, पेण तालुक्यातील दोन, कर्जत तालुक्यातील एक रोहा तालुक्यातील सहा, माणगाव तालुक्यातील सहा, श्रीवर्धन तालुक्यातील तीन, पोलादपूर तालुक्यातील तीन, तर महाड तालुक्यातील तीन शाळांचा समावेश आहे. यात दुर्गम भागांतील शाळांचाही समावेश आहे. त्यामुळे शाळा बंद पडल्याचा सर्वाधिक फटका हा दुर्गम भागांतील विद्याथांना बसणार आहे. त्यामुळे दुर्गम भागांतील पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे.



शाळा सुरळीत ठेवण्याची मागणी


खासगी शाळांकडे पालकांचा वाढता ओढा हे शाळेतील पटसंख्या घटण्यामागचे मूळ कारण आहे. त्यामुळे शासकीय शाळांमधील पटसंख्या थोपवणे हे शिक्षण विभागासमोरील मोठे आव्हान असणार आहे. रायगड जिल्ह्याची भौगोलिक स्थिती वेगळी आहे. काही तालुके हे अतिशय दुर्गम डोंगराळ आहेत. अशा दुर्गम भागांतील शाळा ज्याठिकाणी कमी पटसंख्या आहे, तिथे एक शिक्षक देऊन शाळा सुरळीत ठेवण्याची मागणी केली जात आहे. (Raigad News)

Comments
Add Comment

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर

हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे

उद्या मुंबईतील शाळांना सुट्टी; शाळा बंद आंदोलनाला मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा जाहीर पाठिंबा

मुंबई: राज्यातील शिक्षक बांधवांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय