Water Shortage : शहापूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरूच!

शहापूर : दरवर्षी पाणी टंचाई दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असतांनाही शहापूरकरांच्या नशिबी मात्र पाणी टंचाईचे ग्रहण काही सुटतांना दिसत नाही त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहापूर तालुक्यात तानसा, वैतरणा, भातसा सारखी मोठ-मोठी जलाशये असतांनाही तालुक्यातील जनतेला जानेवारीच्या आरंभापासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.



तालुक्यातील दुर्गम भागातील फुगाळा हद्दीतील आघानवाडी, कसाराखुद यासह अनेक गावांमध्ये पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसण्यास सुरूवात झाली आहे. पाण्यासाठी होणारी पायपीट त्यातून बुडणारी रोजंदारी यामुळे नागरिक हताश झाले आहे. यावर्षी पाऊस मुबलक पडूनही पाण्याची पातळी खालावत असल्याने कसाराखुर्द, फुगाळे परिसरातील विहिरीचे नैसर्गिक जलस्रोत आटले आहेत. तर गावातील विहिरींनी तळ गाठला आहे काही ठिकाणी विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. फुगाळे हद्दीतील आघानवाडी वस्तीतील महिलांना सध्या गावापासून दोन ते तीन किमी अंतरावर असलेले नैसर्गिक पाझर शोधून हंडाभर पाणी टिपून भरण्याची वेळ आली आहे.



आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर 


डबक्यातील पाणी पिण्यासाठी वापरल्याने आरोग्याचा प्रश्न ही उपस्थित होणार आहे. या वस्तीला आता वेळीच टॅकरने पाणीपुरवठा न केल्यास साथीच्या रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असून या वस्तीला त्वरीत टॅकरने पाणीपुरवठा न केल्यास प्रशासनाला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे.


शहापूर तालुक्यात पाणीटंचाई निवारणासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणत निधी खर्च केला जातो मात्र त्याचा विधायक परिणाम कुठेही होताना दिसत नाही, एकीकडे ग्रामीण भागात कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना आदिवासी बांधव मेटाकुटीस आले असताना आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा आहे. या टंचाई निवारणासाठी प्रशासनाला केव्हा जाग येईल, असे श्रमजीवी संघटना, सचिव प्रकाश खोडका यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Navi Mumbai : धक्कादायक घटना ! अवघ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

नवी मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्या सोबत कधी काही होईल सांगता येत नाही. नवी मुंबई(Navi Mumbai) मध्ये एक

Eknath Shinde : 'घर म्हणजे चार भिंती नव्हे, तर स्वप्नांचा महाल'; ठाण्यात जय भवानी सोसायटीतील रहिवाशांचे गृहस्वप्न पूर्ण

- रखडलेले प्रकल्प मार्गी लावणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे : "घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हेत, तर ते प्रेम,

Thane Palghar DCC Bank : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंड

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून ‘सहकार

Bhiwandi Fire : मुंबई-नाशिक महामार्गावर आगीचा महाभडका! टायर-लाकडी गोदामासह अनेक दुकानं आगीच्या विळख्यात

भिवंडी : भिवंडी शहरातील मुंबई-नाशिक महामार्गावरील निम्बोळी परिसरात रविवारी (२८ जून) टायर आणि लाकडी पॅलेटच्या

Road Development : ३० ते ४० मिनिटांचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटात होणार; कल्याण, शिळफाटा

मुंबई : मुंबईतीळ अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. मात्र आता कल्याण मधील

TET Paper Leaked : शिक्षक भरतीला पुन्हा धक्का! परीक्षेच्या एक दिवस आधीच टीईटीचा पेपर लीक, उद्याची परीक्षा तात्पुरती स्थगित

ठाणे : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठा धक्का बसला आहे. ठाण्यात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर फुटल्याची