Water Shortage : शहापूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरूच!

शहापूर : दरवर्षी पाणी टंचाई दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असतांनाही शहापूरकरांच्या नशिबी मात्र पाणी टंचाईचे ग्रहण काही सुटतांना दिसत नाही त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहापूर तालुक्यात तानसा, वैतरणा, भातसा सारखी मोठ-मोठी जलाशये असतांनाही तालुक्यातील जनतेला जानेवारीच्या आरंभापासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.



तालुक्यातील दुर्गम भागातील फुगाळा हद्दीतील आघानवाडी, कसाराखुद यासह अनेक गावांमध्ये पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसण्यास सुरूवात झाली आहे. पाण्यासाठी होणारी पायपीट त्यातून बुडणारी रोजंदारी यामुळे नागरिक हताश झाले आहे. यावर्षी पाऊस मुबलक पडूनही पाण्याची पातळी खालावत असल्याने कसाराखुर्द, फुगाळे परिसरातील विहिरीचे नैसर्गिक जलस्रोत आटले आहेत. तर गावातील विहिरींनी तळ गाठला आहे काही ठिकाणी विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. फुगाळे हद्दीतील आघानवाडी वस्तीतील महिलांना सध्या गावापासून दोन ते तीन किमी अंतरावर असलेले नैसर्गिक पाझर शोधून हंडाभर पाणी टिपून भरण्याची वेळ आली आहे.



आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर 


डबक्यातील पाणी पिण्यासाठी वापरल्याने आरोग्याचा प्रश्न ही उपस्थित होणार आहे. या वस्तीला आता वेळीच टॅकरने पाणीपुरवठा न केल्यास साथीच्या रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असून या वस्तीला त्वरीत टॅकरने पाणीपुरवठा न केल्यास प्रशासनाला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे.


शहापूर तालुक्यात पाणीटंचाई निवारणासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणत निधी खर्च केला जातो मात्र त्याचा विधायक परिणाम कुठेही होताना दिसत नाही, एकीकडे ग्रामीण भागात कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना आदिवासी बांधव मेटाकुटीस आले असताना आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा आहे. या टंचाई निवारणासाठी प्रशासनाला केव्हा जाग येईल, असे श्रमजीवी संघटना, सचिव प्रकाश खोडका यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Thane Fire : ठाण्यात गावदेवी मार्केटला भीषण आग; दोन जणांचा मृत्यू, अग्निशमन दलाचे जवान जखमी

ठाणे : ठाणे पश्चिममधील नौपाडा परिसरातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केटच्या इमारतीला गुरुवारी पहाटे भीषण आग

Kalyan-Dombivli Municipal Corporation (KDMC) : अनधिकृत होर्डिंग्जमुळे KDMC ला मोठं नुकसान; भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रेंचा गंभीर आरोप

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत (KDMC) अनधिकृत होर्डिंग्जच्या माध्यमातून सुरू असलेल्या कथित गैरव्यवहारामुळे

Badlapur Crime : बदलापूरमधील पीडित चिमुकलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखेर सरकारने उचलली!

घोषणेनंतर तब्बल दोन वर्षांनी दहावीपर्यंतचे शुल्क मंजूर; 'आरटीई'अंतर्गत शाळांना थेट निधी देणार मुंबई : संपूर्ण

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा

पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली तात्पुरती स्थगिती दोन्ही पक्षांची

Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात RPF जवानावर तिघांचा हल्ला; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानावर तिघांकडून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर

Kalyan Crime News : कल्याणमध्ये टवाळखोरांचा हैदोस! गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीला बेदम मारहाण, डोक्यात बाटल्या फोडल्या

कल्याण: कल्याण पूर्व परिसरात पुन्हा एकदा टवाळखोरांची दहशत समोर आली आहे. गार्डनमध्ये बसून गप्पा मारत असलेल्या