School Admission : यंदाच्या शैक्षणिक सत्रात 'या' ५,०७२ विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश!

  35

पालघर : आर्थिकदृष्ट्या मागास आणि वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी खासगी शाळांमध्ये आरटीईअंतर्गत (RTE) २५ टक्के मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता जिल्ह्यातील २७२ शाळांनी नोंदणी केली असून, त्या शाळांअंतर्गत ५०७२ विद्यार्थ्यांना पहिलीत मोफत प्रवेश (School Admission) दिला जाणार आहे. यासाठी १४ जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणीस सुरुवात झाली असून बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात.



ऑनलाइन अर्ज करण्यास २७ जानेवारीपर्यंत मुदत


'आरटीई' अंतर्गत पहिली आणि नर्सरीकरिता प्रवेश दिला जातो. यामध्ये एकूण २७२ शाळांमधून ५०७२ विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश दिला जाणार आहे, तर डहाणूमधील ६३ आणि जव्हारमधील ७ अशा एकूण ७० विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक म्हणजेच नर्सरीमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशांकरिता ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. आता पालकांना बालकांचा ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी १४ ते २७ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.


पालकांनी या मुदतीत आपल्या पाल्याचा अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर एकाच ठिकाणाहून सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे. तालुका डहाणू १५ शाळा जागा, जव्हार ३ शाळा ३७ जागा, पालघर ६९ शाळा ९१७ जागा, तलासरी १२ शाळा ११४ जागा, वसई १५३ शाळा ३६३७ जागा, विक्रमगड ७ शाळा ५८ जागा, वाडा १३ शाळा १४५ जागा अशा प्रकारचे शाळा आणि प्रवेश संख्यांच स्वरूप आहे. (School Admission)

Comments
Add Comment

वसई -विरार शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य

कचराकुंडीत कचरा जमा करण्याचे पालिकेकडून आवाहन वसई : वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. वाढते

घनकचरा व्यवस्थापनासाठी कंत्राटदारांची स्पर्धा

कंत्राटासाठी पहिल्यांदाच ४६ निविदा  विरार : वसई-विरार पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्याने मागविण्यात

खोडाळा हायस्कूलचे पत्रे पावसाळ्यातही गायब !

मोखाडा : खोडाळा येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळ संस्थेची अनुदानित शाळा आहे. या शाळेत खोडाळा आणि

पालघर नगर परिषदेचे पैसे ‘पाण्यात’!

२० गावांकडे ७ कोटी थकले पालघर : पालघर नगर परिषदेसह जवळच्या वीस गावांनी गेल्या पंधरा वर्षापासून एकाच योजनेतून

कंत्राटदारांपुढे महापालिका हतबल!

पुन्हा उघडल्या ठोक रकमेच्या निविदा विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे यापुढे

खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

पालघर : खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोईसर मधील