Tadoba Chandrapur : ताडोबातील 'त्या' गिधाडाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

  61

चंद्रपूर : काही दिवसांपूर्वी ताडोबा येथून ५ राज्ये पालथी घालत थेट तामिळनाडूपर्यंतचा सुमारे चार हजार किलोमीटरचा प्रवास केलेल्या ‘एन-११’ या गिधाडाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. या गिधाडाचा मृतदेह पुडुकोट्टई विभागातील अरिमलम थंजूर गावातील तिरुमायम वनपरिक्षेत्रामधील वीज वाहक तारांच्या खाली आढळला.


ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी जंगलात २१ जानेवारी २०२४ ला जटायू संवर्धन केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. हरियाणा राज्यातल्या पिंजोर येथील संशोधन केंद्रातील धोकाग्रस्त व नष्ट प्राय होण्याच्या उंबरठ्यावर असलेले दहा पांढऱ्या पाठीचे गिधाड पक्षी या केंद्रात आणण्यात आले होते. या सर्व गिधाडांना प्रथम या वनक्षेत्राच्या वातावरणाची सवय व्हावी म्हणून त्यांना येथे उभारलेल्या 'प्री-रिलीज एवेयरी ' मध्ये तज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. ४ जुलै २०२४ ला 'बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी'च्या वरिष्ठ वैज्ञानिकांनी या सर्व दहावी गिधाडांना 'जीएसएम ट्रान्समिशन ट्रेकिंग डिव्हाइस' देखील लावले होते. त्यामुळे येथून सुटल्यानंतर, त्यांच्या हालचाली आणि वर्तनावर लक्ष ठेवण्यासाठी ‘टॅगिंग’ करण्यात आले.



'जटायू संवर्धन योजने'अंतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या दहा गिधाडांपैकी तीन गिधाडांचा मृत्यू २७ नोव्हेंबर २०२४ ला झाल्याची माहिती समोर आली होती. ‘एन-११’ या गिधाडाने महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजराथ कर्नाटक, आंध प्रदेश या राज्यातून चार हजार किलोमीटरचा प्रवास करुन तामिळनाडू गाठले होते. गेल्या तीन आठवड्यांपासून हे गिधाड कलसपाक्कम तालुक्यात वास्तव्यास होते.


गेले काही दिवस या गिधाडाचे एकाच जागेवरील लोकेशन मिळत असल्याने बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या माध्यमातून शोधमोहीम राबवली गेली आणि त्यातच या गिधाडाचा जळालेला मृतदेह आढळून आल्याचे ‘बीएनएचएस’चे संचालक किशोर रिठे यांनी सांगितले. उंच टाॅवरच्या वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने हा मृत्यू झाला असण्याची पुष्टी त्यांनी जोडली.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती