नितेश राणेंच्या निर्देशानंतर मिरकरवाडा बंदर परिसरातील ३१९ बेकायदा बांधकामांना नोटीस

रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरामध्ये मत्स्यव्यवसाय विभागाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटवण्याचे निर्देश मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य विभाग रत्नागिरी यांना दिले होते. हे निर्देश मिळताच अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील सात दिवसांत अनधिकृत बांधकाम स्वतः हटवा अन्यथा कारवाई केली जाईल, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशासनाने मिरकरवाडा बंदर परिसरातील ३१९ बेकायदा बांधकामांना नोटीस बजावली आहे. मंत्री नितेश राणे यांनी पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम हटवण्याचे निर्देश दिले आहेत.



मिरकरवाडा बंदर हे महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या मालकीचे आहे. या सरकारी जागेत खासगी बांधकामांना सक्त मनाई आहे. या नियमाचे उल्लंघन करत ३१९ अनधिकृत बांधकामं झाली आहेत. ही बांधकामं हटवण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. प्रशासनाने कारवाई केली तर ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे त्यांच्याकडूनच बांधकाम हटवण्याचा खर्च वसूल केला जाणार आहे. नियोजीत विकासकामांतील अडथळे दूर करण्यासाठी अनधिकृत बांधकामे हटवण्याचे काम सुरू झाले आहे.



मिरकरवाडा बंदराच्या ११ हेक्टर जागेवर कोट्यवधी रुपये खर्च करुन विकासकामं केली जाणार आहेत. बंदरात ३०० ट्रॉलर्स आणि २०० पर्ससीन नौका अशा एकूण ५०० नौका उभ्या राहतील अशी व्यवस्था केली जाणार आहे. हे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. शासनाने त्यासाठी निधीही मंजूर केला आहे. याकरिता बंदरातील जागा मोकळी करण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका