नितेश राणेंच्या निर्देशानंतर मिरकरवाडा बंदर परिसरातील ३१९ बेकायदा बांधकामांना नोटीस

रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरामध्ये मत्स्यव्यवसाय विभागाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटवण्याचे निर्देश मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य विभाग रत्नागिरी यांना दिले होते. हे निर्देश मिळताच अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील सात दिवसांत अनधिकृत बांधकाम स्वतः हटवा अन्यथा कारवाई केली जाईल, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशासनाने मिरकरवाडा बंदर परिसरातील ३१९ बेकायदा बांधकामांना नोटीस बजावली आहे. मंत्री नितेश राणे यांनी पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम हटवण्याचे निर्देश दिले आहेत.



मिरकरवाडा बंदर हे महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या मालकीचे आहे. या सरकारी जागेत खासगी बांधकामांना सक्त मनाई आहे. या नियमाचे उल्लंघन करत ३१९ अनधिकृत बांधकामं झाली आहेत. ही बांधकामं हटवण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. प्रशासनाने कारवाई केली तर ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे त्यांच्याकडूनच बांधकाम हटवण्याचा खर्च वसूल केला जाणार आहे. नियोजीत विकासकामांतील अडथळे दूर करण्यासाठी अनधिकृत बांधकामे हटवण्याचे काम सुरू झाले आहे.



मिरकरवाडा बंदराच्या ११ हेक्टर जागेवर कोट्यवधी रुपये खर्च करुन विकासकामं केली जाणार आहेत. बंदरात ३०० ट्रॉलर्स आणि २०० पर्ससीन नौका अशा एकूण ५०० नौका उभ्या राहतील अशी व्यवस्था केली जाणार आहे. हे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. शासनाने त्यासाठी निधीही मंजूर केला आहे. याकरिता बंदरातील जागा मोकळी करण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण